Sunday 29 September 2019

ढग फुटतो तेंव्हा ! - cloudburst explained by Umakant chavan

©उमाकांत चव्हाण.

ढगफुटी ही एक अशी नैसर्गिक आपत्ती किव्हा घटना आहे की ज्यामध्ये आंतर रेणूची फोर्स आणि H2O म्हणजे पाणी यांच्या रेणू मध्ये खूप फास्ट व तीव्र प्रमाणात प्रक्रिया घडते व अंतर रेणुची शक्ती झपाट्याने घट झाल्यामुळे किंवा ढगांमधील इलेक्ट्रोस्टॅटीक प्रेरणा पेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे पाण्याचे रेणू जास्त वजनदार बनतात आणि त्यामुळे ढग वाढीव झालेले पाणी धारण करू शकत नाही. पाण्याचे रेणू जनतेने जास्त वाढतात व घनरूप होतात आणि इलेक्ट्रो फोर्सच्या अधिक त्यामुळे ढग त्यांना धरून ठेवू शकत नाहीत पाण्याचे प्रमाण जास्त व अधिक होत गेले आणि वजन जर वाढले तर ते एकाच क्षणात एकाच ठिकाणी टाकतात, यालाच क्लाऊडबर्स्ट किंवा ढगफुटी असे म्हणतात.

हे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात असते की एका चौरस एकरात ७२,३०० टन इतके मोठे प्रमाणात पाणी सोडू शकतो, ही एक पाण्याची भिंत आहे अचानक आकाशातून फुटते आणि आपल्यावर येऊन आढळते.

परंतु सुदैवाने ही घटना सारखी होत नाही, वास्तविक पाहता क्लाऊडबर्स्ट किंवा ढगफुटी या घटना वारंवार होत नाहीत, कधीकधी ओरोग्रफिक लिफ्ट मुळे किंवा गरम हवा अचानक वर जाऊन थंड हवेत मिसळते आणि अचानक पाण्याची घनता वाढते १७०० साली घडलेली घटना असो किंवा १८०० ते २००० कालखंडात घडलेल्या घटना असो ढगफुटी पहिल्यापासून जमिनीचे उष्णता वाढल्यामुळेच होत आहे. शिवाय अचानक वातावरणाचा जो बदला होतो त्यामुळे देखील ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होते. कधीकधी सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे जमीन जिथे जास्त तापते तिथली हवा थंड व विरळ होऊन वरती जाते आणि आजूबाजूला जमलेल्या ढगातील पाणी घेऊन ढग एकत्र येतात त्यामुळे ढगफुटीची प्रक्रिया होते ही जरी एक सायंटिफिक गोष्ट असली तरीही ढगफुटी सदृश्य होणार्‍या घटना सध्या वारंवार घडत आहेत, यांची घडण्याची प्रखरता व वारंवारता (इन्टेन्सिटी ऑफ इव्हेंट) इथून पुढे वाढतच जाणार आहे.

त्याचे कारण आहे क्लायमेट चेंज..!

मुख्यता वातावरणातील उष्णतेचा मानवावर जसा परिणाम होतो, तसाच परिणाम निसर्गावर ही होतो. दोनशे प्रजाती दररोज नष्ट होत आहेत, याचा विचार करता मानवही प्रजाती देखील पुढील बारा-पंधरा वर्षांत नष्ट होण्याच्या मार्गावर उभी आहे. याकडे अजूनही मानवाचे लक्ष नाही. लवकरच याची प्रचिती येत राहील हीच परिस्थिती आहे.

प्रत्येक जण फक्त प्रगतीसाठी विकासासाठी पळतोय, परंतु नैसर्गिक प्रक्रिया आणि निसर्ग याला समजून न घेता जर आपण चंगळवाद व विघातक विकास याकडे लक्ष दिले तर निश्चितच मानव जातीचा अंत पुढच्या पंधरा वर्षात नक्कीच होईल. शास्त्रज्ञांनी पृथ्वीचे तापमानवाढ थांबवण्याची प्रक्रिया आपल्याला २०१३ पर्यंतच करणे अनिवार्य आहे असे सांगितले होते, २०१३ ला आपण हे तापमान रोखण्यासाठी सक्षम होतो, परंतु ती तारीख सोडून गेली तरीही आपण अजूनही यावर विचार करत आहोत.

दोन्ही ध्रुवावरील बर्फ यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मायक्रोब्ज आणि विघातक जिवाणू आहेत ते एकविसाव्या शतकाच्या अखेरीस वितळणार होते ते जून २०१८ ला वितळायला सुरुवात झाली हा रिपोर्ट ज्या दिवशी बाहेर आला त्या दिवशी पासून शास्त्रज्ञ सांगताहेत की सगळं संपणार आहे. हातात फक्त पाच ते सहा वर्ष आहेत, तरीदेखील अजूनही माणूस जागरूक नाही.

आपल्याला अजुन देखील हे कळत नाही की आता आपलं स्वतःचं जीवनच धोक्यात आहे, एक वेळ होती की ज्यावेळी *पृथ्वी वाचवा* किंवा *पर्यावरण वाचवा* असं ओरडत फिरुन सांगायला लागायचं, पण ती वेळ आपण २०१३ ला संपवली, आता *मानव प्रजाती वाचवा* हे सांगण्याची गरज आहे आणि यासाठी फक्त हातात *पाच वर्ष उरली आहेत* कारण हा विध्वंस होणार आहे हा निश्चितच आहे, फक्त तो पाच वर्षांनी होईल तर सहा वर्षांनी होईल आणि किती पुढे ढकलता येईल हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

विचार करा आणि कृती देखील करा..!

©उमाकांत चव्हाण.

https://youtu.be/Qvjwccilpew

Tuesday 27 August 2019

सावधान - पन्हाळ्याचा रस्ता खचतो आहे ! Umakant Chavan.

©उमाकांत चव्हाण.

भूगर्भातील होणाऱ्या विचित्र हालचाली मुळे आज-काल जे घडतंय ते आपल्याला सहजासहजी दिसतं, परंतु मानवी कृत्यामुळे झालेली पर्यावरणाची आणि आपल्या निसर्गाची हानी कधीही न भरून येणारी आहे, आणि ते कोणालाच सहज दिसत देखील नाही यात वादच नाहीये.

गेल्याच काही आठवड्यांपूर्वी कोल्हापूरची शान असलेला पन्हाळा आणि त्याच्या आजूबाजूचा डोंगराचा परिसर भूस्खलनामुळे हळूहळू खचू लागलेला आहे, पहिल्या आठवड्यात तर पावसामुळे पन्हाळ्याचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर चक्क मोठाली भेग पडली, इतकं मोठं निसर्गात आपण नुकसान करत आहोत याची मानवाला जरादेखील कल्पना नाहीये.

आपण आपल्या सोयीकरता डोंगर-दऱ्या, नद्या, पहाडी भाग या ठिकाणी घर बांधणे, शेतजमीन करणे, विघातक प्रकल्प करणे, खाणी काढणे, अशा वेगवेगळ्या पर्यावरणाला घातक असणाऱ्या संकल्पना राबवत आहोत, परंतु त्यामुळे पर्यावरणाची- निसर्गाची किती जास्त पटीने हानी होत आहे याकडे आपलं जरादेखील लक्ष नाही.

किंबहुना निसर्ग आपल्यावर कोपतो आहे हे दिसत असून देखील आपण जाणून बुजून त्या गोष्टींकडे कानाडोळा करत आहे.

कधी ना कधी हे मानवाला, मानवी पिढीला सोसायला लागणारच, परंतु किमान आपली भावी पिढी तरी सुरक्षित आणि आनंदी राहावी याकरिता पर्यावरण संरक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य समजून आजपासूनच आपण या सर्व गोष्टींच्या सोबत पर्यावरणाला देखील तितकंच महत्त्व देणे गरजेचे आहे जितकं आपली मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांना देतो.

कृपया पर्यावरणाच्या या लढ्यात साथ देऊन निसर्ग वाचवण्याकरिता मदत करा आणि ही गोष्ट तुम्ही तुमच्या घरापासूनच सुरुवात करू शकता.

© उमाकांत चव्हाण.

Kaas - कास मध्ये बिबट्या आलाय ! मग आता त्याला मारायचे काय ? Umakant Chavan


https://youtu.be/OBtqDLxW3vQ

मानव आपल्या स्वार्थासाठी वन्यजीवांची अतोनात हानी करत आहे, पण आता त्याच्या घरात घुसून जर त्यांना बाहेर काढायचे ठरवले तर ते कितपत योग्य आहे आपणच ठरवूया ! जाणून घ्या त्यांच्या व्यथा...!

आपली मते आणि प्रतिक्रिया इथं जरूर मांडा..!

Sunday 21 July 2019

गटारी म्हणजे फक्त दारू पिणेच का ? Umakant chavan

गटारी जवळ आली आहे ?

©उमाकांत चव्हाण.

खरंच मला या विषयावर लिहावं असं बरेच दिवस वाटत होतं, योगायोगाने दुपारी एक मित्र भेटला आणि बोलला यंदा गटारीला बाहेर जाऊया..!

तसं पण नॉनव्हेज खानं मला जास्त आवडत नाही, त्यामुळे बाहेरचं नॉनव्हेज शक्यतो टाळतोच... परंतु *गटारी* म्हणजे काय ? हा प्रश्न तसाच डोक्यात राहिला. आज घरी आलो आणि ठरवलं या माझ्या देशातल्या सुंदर परंपरे मधल्या *दीप अमावस्येला* ज्या लोकांनी *गटारी* म्हणून नवीन नाव दिलेला आहे हे एकंदरीत आलं कसे ? यावर थोडासा प्रकाश टाकावा, म्हणून हा एवढा लेखन-प्रपंच...!

खरंतर *गटारी अमावस्या* हा सणच भारतीय संस्कृतीत कुठेच नाही. गटारी अमावस्या ही आपण निर्माण केलेली वृत्ती आहे. गटारी म्हणजेच अपभ्रंश झालेला *गत-आहार* हा शब्द आहे, गत आहार म्हणजे जुना किंवा पूर्वीचा आहार यामध्ये आदिम काळापासून मासाहार चालू असायचा. आदिम कालखंडात लोक शिकार करून जगायचे. त्यानंतर आपल्या देशात शेतीप्रधान संस्कृती निर्माण झाली. परंतु या *गत-आहाराला* गटारी नावाने (अलंकारिक ?) केलं गेलं आणि आणि या दरवर्षी श्रावणाच्या आधी येणाऱ्या अमावस्येला आपण गटारी अमावस्या म्हणू लागलो.

*शुभम करोति कल्याणम, आरोग्यम् धनसंपदा..
शत्रूबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते..!*

आपल्या संस्कृतीत पंचमहाभूतांना प्रचंड महत्त्व दिले गेले आहे. या पंचमहाभूतांना मध्ये *अग्निदेव* म्हणजेच आपल्या घरातील दिवा ज्याचे स्थान प्रत्येक देवघरात, शुभकार्यात खूप महत्त्वाचे मानले जाते. हा दिवा आपण केलेल्या कर्माची साक्ष म्हणून मानला जातो. शास्त्रातही असंच म्हणलं गेलेला आहे की, दिव्याला साक्षी किंवा अग्नीला साक्षी मानून मी हे व्रत करतो. तसेच अग्नीला साक्षी मानून आज देखील आपले लग्न ठरते.

*अग्नीची* जी मूलभूत संरचना आहे किंवा अग्नीचे स्थान आपल्या संस्कृतीत आहे ती खूप मोठी आहे. त्या समईतील *ज्योतीकडे* पाहून आज देखील आपण प्रसन्नतेने चेहऱ्यावर आनंद आणतो आणि आणि घरात कितीही अंधकार  असेल तरीही त्या ज्योतीतील अग्नि आपलं घर स्वच्छ व प्रकाशमान ठेवण्याकरिता प्रयत्न करत असतो.

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी सर्व दिव्यांची पूजा करायची, रांगोळी काढायची, पाटावर दिवे मांडून त्यांना गंध-अक्षता-फुलं वाहायची आणि नमस्कार करायचा. त्याला नैवेद्याला  कणकेचे गोड दिवे ठेवण्याची परंपरा देखील काही ठिकाणी आहे.

असा हा भारतीय संस्कृतीतील अतिशय सुंदर सण पंचमहाभूतांना साक्षी मानून साजरा केला जातो. त्या सणाला *दिव्याची अमावस्या* किंवा *दीप-अमावस्या* मानले जाते त्याचा अमावस्येला आज काल गटारी अमावस्या म्हणून दारू ढोसायची नियमबद्ध परंपरा करण्याचे अवडंबर समाजात रुजले गेले आहे ते खरंच चुकीच आहे असं मला वाटतं.

गटारी अमावस्या म्हणजे फक्त दारू पिण्याचा दिवस ! बास एवढा एकच विचार समाजात रूढ झालेला आहे आणि आपली नवीन पिढी व्यसनाधीन होऊ लागलेली आहे.

असा कोणताही धर्म खरंच सांगतो का की दारू प्या, कोंबडी आणि बकरे कापा व पार्ट्या करा ?

बहुदा कोणताच धर्म असे सांगत नाही, पण आजकाल बरेच लोक खुलेआम नियम परंपरा धाब्यावर बसवून चंगळवादाला आपलंसं करत आहेत. याचा धोका त्यांच्या स्वतःच्या शरीराला व भावी पिढीला देखील नक्कीच आहे. दारू पिणे किंवा मांसाहार करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. याबाबत माझं कुठलंही मत मी मांडू शकणार नाही कारण की ज्याचं त्याला कळतं किती पिली पाहिजे ? का नाही ? परंतु आपल्या संस्कृतीतील आपल्या परंपरेतील असलेल्या चांगल्या सणांना आपण जर हिणवून *गटारी अमावस्या* असे नाव देत असेल तर ते नक्कीच योग्य नाही असे मला वाटते.

दीप-अमावस्या साजरी करणे हा आपल्या परंपरेतील उत्कृष्ट सण त्या दिवसापासून श्रावण चालू होतो व श्रावणात मांसाहार वर्ज्य केला जातो, असे मानले जाते. परंतु असं कुठेही नोंद नाहीये की श्रावणाच्या आदल्या दिवशी भसाभसा बकरी आणि कोंबडी कापून पोट भरून घ्या व महिन्याभराची दारू एकदम ढोसून घ्या.

इथून पुढे आपल्या संस्कृतीतील गत-हारी या सणाला आपण "दीप अमावस्या" या नावानेच संबोधून आपली परंपरा आणि आपले सण अबाधित ठेवू असं मला वाटतं. आपल्या परंपरेचा आदर करून आपल्या देशातील संस्कृतीचा आदर करून पंचमहाभूतांच्या बद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच *दीप-अमावस्या* होय.

(कृपया हा लेख संपूर्णतः माझ्या वैयक्तिक विचारांशी निगडीत आहे यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा कसलाही हेतू नाही)

©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.

Friday 12 July 2019

कमळगडाच्या पाठीवर...! Fort Kamalgad


कमळगड / कमालगड
जिल्हा - सातारा
उंची - ४२०० फूट.

©Umakant chavan.

संपूर्ण जावळीच सुंदर...! जावळीच्या खोऱ्यात धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. जावळीच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गडकोट अलंकारासारखे धारण केले आहेत, त्यापैकी एक आहे कमळगड..!

दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक दोन्ही बाजूच्या पाण्यातून कमळ वरती यावे तसा एक देखणा किल्ला वर आलेला आहे तो म्हणजे कमळगड. दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.

जावळीच्या खोऱ्यात वाई मधून दोन मार्ग कमळगडाला गेलेले आहेत, एक आहे वाईहून नांदवणे गावातून, नांदवणे गावी येण्यास सकाळी ९.३० वाजता एस.टी. बस आहे. तर दुसरा आहे जांभळी रोडने तुपेवाडी मार्गे.
वाळकी नदीच्या खोर्‍यातील असरे, रेनावळे वासोळे गावी वाईहून एस.टी. ने येता येते.

या दोन्ही गावातून पंधरा वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर गडाच्या निकट पोहचता येते व साधारणतः दीड ते दोन तासांच्या चढणीनंतर तुम्ही गडावर येता. वर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजुबाजूचा डोंगरदर्‍यांचा सुंदर मुलूख दृष्टिपथात येतो.

महाराष्ट्रातील बाकीच्या किल्ल्यावर आढळणारे प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत. गडाला एक वाट जाते ती एका खोबणीतून तुम्हाला गडमाथ्यावर आणते. गडावर पाहण्यासारखी मोठी अशी ठिकाणे नाहीत फक्त एक कावेची देखणी विहीर आहे. वरती पोहचताच गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. या डोंगररांगेला नवरानवरी चे डोंगर म्हणतात.

थोडं पुढे गेल्यावर जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायर्‍याही आहेत. हिला गेरूची किंवा कावेची विहीर म्हणतात. या ५० - ५५ खोलखोल पायर्‍या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. या विहिरीत जाताना आजूबाजूच्या वातावरणातील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.

गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथर्‍यांचे अवशेष दिसतात.

नैर्ऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोबत कमळगडाला मिळाली आहे. गडाला भेट देताना धोमचे हेमाडपंती शिवमंदिर जरूर पाहावे, खूपच प्रेक्षणीय आहे. हे मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झाले.

वाईपासून वाटेतच मेनवलीचा प्रसिद्ध घाट लागतो. भारतीय चित्रपट सृष्टीत बऱ्याच चित्रपटात (गंगाजल, स्वदेश) या घाटाचे चित्रण केले आहे. इथंच शेजारी नाना फडणवीस यांचा ऐतिहासिक वाडाही आहे. जवळच मराठी कवी वामन पंडित यांची भोमगावाला समाधी आहे.

कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.

√ गडावर जाताना कचरा करू नका..गडाचे पावित्र्य राखा..!

√ कोणत्याही गडावर गेल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्या आणि बॉटल्स इकडेतिकडे टाकू नका..!

√ सोबत नेलेले सर्व साहित्य सोबत घेऊन परत जा.

√ गडावर मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवा, गडाच्या परिसरात वन्यजीव असतात त्यामुळे त्यांचे आधिवास अबाधित ठेवा.

√ गडाच्या परिसरातील वन्यजीवांचा माणसाला व माणसाचा वन्यजीवला धोका होऊ शकतो त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहा.

√ गडकिल्ले फिरताना शक्यतो कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त पंधरा लोकांचा ग्रुप बनवा, त्यापेक्षा जास्त लोकं नसावीत, शिवाय शनिवार रविवार सोडून गडकोट भटकंतीला जा.

√ गडावर आपल्या सोबत गडाचा व वन्यजीवांची चांगली माहिती असणारा माणूस हवाच.

√ गडावर पावसाळ्यात निसरडे होते, गडाचे दगड सुटतात तरी फोटोसाठी अति हौशी पणा करून गडाच्या कडेला जाऊ नका, धोका होऊ शकतो.

√ आपले किल्ले गडकोट आणि आपल्या भागातील सुंदर ठिकाणं ही सुंदर राहिलीच पाहिजेत हे आपलं कर्तव्य आहे, त्यांचे पावित्र्य राखूनच पर्यटन करा..

©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.

लक्ष्मीविलास पॅलेस, कोल्हापूर. / Laxmi Vilas palace, Kolhapur


लक्ष्मीविलास पॅलेस, कोल्हापूर.

©Umakant chavan.

कृपया "लक्ष्मीविलास पॅलेस, कोल्हापूर" आणि "लक्ष्मीविलास पॅलेस" बडोदा यांच्यात गफलत करू नये.

तो लक्ष्मी विलास पॅलेस हा गुजरातच्या वडोदरा शहरातील एक आलिशान राजवाडा आहे. हा राजवाडा बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव ह्यांनी १८९० साली १.८ लाख पाउंड इतक्या खर्चामध्ये बांधला. तिसरे सयाजीराव यांनी आपल्या कारकिर्दीत बडोद्याचे संस्थान वैभवसंपन्न केले. त्यांनी आकर्षक भव्य इमारती, उद्याने, हिरवळीची मैदाने, कारंजी, रुंद रस्ते तयार करून बडोदा शहर सुशोभित केले. त्यांनी बांधलेल्या इमारतींमध्ये 'लक्ष्मीविलास पॅलेस' या राजवाड्याच्या वास्तूचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.

तर महाराष्ट्रात लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर हे कोल्हापूर मधील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या यादीत असलेले छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे. कोल्हापूर शहरापासून उत्तरेला बावड्याला जाताना शहरापासून पाच किलोमीटरवर ही देखणी वास्तू आपणास पाहायला मिळते.

लक्ष्मीविलास पॅलेस चे स्थान कोल्हापूरच्या इतिहासात खूप महत्त्वाच आहे. २६ जून १८७४ साली कागलच्या घाडगे घराण्यात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी म्हणजेच सण १८८४ मध्ये कोल्हापूरच्या छत्रपती राजे घराण्यात त्यांना दत्तक देण्यात आले. सन १८९४ मध्ये कोल्हापूरच्या गादीवर राजश्री शाहू महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला.

छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य फक्त भारतापुरतेच मर्यादित नसून जगभरात त्यांचे कार्य गौरवले गेलेले आहे. शेती, सिंचन, पाणी व्यवस्थापण, अभियांत्रिकी शैक्षणिक विकास, कुस्ती खेळ कला व संगीत या सर्व क्षेत्रात त्यांनी मातब्बर असणाऱ्या त
लोकांचा त्यांनी कायम सत्कार व गौरव केलेला आहे. कला क्रीडा प्रकाराला त्यांनी कायमच राजाश्रय दिलाच, परंतु अभियांत्रिकी आणि शेतीप्रधान देशासाठी त्यांनी प्रचंड भरघोस कार्य केले.

राधानगरीचा लक्ष्मी सागर जलाशय देखील त्यांनी बांधलेली एक अप्रतिम वास्तू आजही कोल्हापूरकरांना पाण्याची सुबत्ता मिळवून देते. मागासवर्गीय दुर्बल घटकांचा विकास आणि सर्व धर्माच्या सामाजिक विकासासाठी त्यांनी भरघोस कार्य केले.

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

सध्यस्थितीत महाराजांच्या या जन्मस्थानाचे रिनोव्हेशनचे काम पूर्ण होत आले आहे. इथं प्रसिद्ध राधानगरी धरणाची प्रतिकृतीदेखील बांधली गेली आहे ज्यावर आपणास प्रत्यक्ष जाता येते. भारतीय पुरातत्व विभाग यांच्या विद्यमाने इथे महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग व विविध घटना यांचे चित्रण करून त्याचे सुंदर संग्रहालय करण्याचे ठरवले आहे. हे संग्रहालय झाल्यानंतर कोल्हापुर च्या सौंदर्याला अजून झळाळी येईल यात शंकाच नाही...

टीप : कृपया स्थानिक पर्यटकांनी गर्दी करू नये. बाहेरच्या पर्यटकांना प्राथमिकता द्यावी,(अतिथी देवो भव: मधून आपली संस्कृती दिसते) पॅलेस आपल्या जवळ असलेने कधीही सहज पाहता येतो.

कृपया या परिसरात कचरा करू नये, प्लास्टिक पिशव्या इतरत्र टाकू नयेत, सेल्फीसाठी धरणावर गर्दी करू नये,  ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य राखा..

पॅलेस शेजारी असलेल्या विरगळी, शिळा या प्राचीन आहेत, त्यांना हात लावू नये, पुरातन असल्या कारणाने त्यांना तडे जाण्याची शक्यता आहे, त्या दगडावर चढू नये.

सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत लक्ष्मीविलास पॅलेस पाहता येतो.

©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.
© Umakant chavan 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर / Shivaji University kolhapur.


शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

©Umakant Chavan

१९६२ रोजी कोल्हापूरच्या दक्षिणेला स्थापित झालेल्या शिवाजी युनिव्हर्सिटीला सध्या भारतात मानाचे स्थान आहे. सार्वभौम स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेले हे विद्यापीठ म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना मिळालेला शिक्षणाचा खजिनाच होय.

शिवाजी युनिव्हर्सिटी चे कॅम्पस ८५३ एकर मध्ये पसरलेले आहे. विद्यापीठाचे उद्घाटन १८ नोव्हेंबर १९६२ रोजी भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री नामदार यशवंतराव चव्हाण व बाळासाहेब देसाई यांनी या विद्यापीठाच्या स्थापनेत खूप मोलाची कामगिरी बजावली.

विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती. पण रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडेच राहिला आणि सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठाकडे गेला (इ.स. २००४). त्यामुळे आता कोल्हापूर, सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन विद्यापीठापैकी एक आहे.

कोल्हापूर सांगली सातारा यामधील जवळजवळ २८०  कॉलेजेस शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत कार्य करतात. "ज्ञानमेवामृतम" हे विद्यापीठाचे  ब्रीदवाक्य आहे.

विद्यापीठाने सध्या भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर यांच्यासोबत मटेरियल सायन्स वर काम करायला सुरुवात केलेली आहे, याव्यतिरिक्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओ मॅग्नेशियम मुंबई व इतर अनेक मोठमोठ्या देश विदेशातील संस्थांसोबत विद्यापीठाचे कार्य चालते.

सध्य स्थितीला जवळ जवळ अडीच लाख विद्यार्थी इथं शिक्षण घेतात. विद्यापीठाला शिक्षण गुणोत्तराचे मॅकचे "ए" ग्रेडचे मानांकन मिळाले आहे.

भारतातील नामांकित अशा पन्नास विद्यापीठांपैकी एक नावाजलेले विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाची ख्याती आहे, विद्यापीठ हे नॅशनल लेव्हल ला ४४ व्या क्रमांकात आहे.

विद्यापीठाची बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर लायब्ररी ही एक महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लायब्ररी पैकी एक आहे. विद्यार्थ्यांच्या फक्त शैक्षणिक पुस्तकांची पैकी विविध पुस्तकांची रेलचेल या ग्रंथालयात आहेच परंतु अभ्यासाव्यतिरिक्त साधारणता या ग्रंथालयात तीन लाखांपेक्षा जास्त अशी ग्रंथसंपदा आहे.

विद्यापीठाचा कॅम्पस अतिशय सुंदर असून विद्यापीठात प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळे केलेले आहे. विद्यापीठाच्या आवारात दोन तलाव असून आजूबाजूला खेळण्यासाठी मैदाने देखील आहेत. याव्यतिरिक्त मोठे ऑडिटोरियम, तीन कॅन्टीन आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी करिता वसतिगृहाची देखील सोय आहे.

विद्यापीठाचा परिसर प्रशस्त असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सोई करता विद्यापीठ अनुकूल आहे. शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील देखण्या विद्यापीठांपैकी एक आहे, विद्यापीठ मध्ये बॉटनी डिपारमेंट, पर्यावरण शास्त्र विभाग, कला, क्रीडा, जर्नालिझम, झूलॉजी, बायोलॉजी, शास्त्र, भूगोल, फुड सायन्स, केमिस्ट्री, टेक्नॉलॉजी, एम बी ए, सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, हिस्टरी, इकोनॉमिक्स, मराठी हिंदी व विदेशी भाषांचा देखील समावेश आहे.

विद्यापीठाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपले लक्ष वेधून घेतो. विद्यापीठाचा परिसर अतिशय सुंदर आणि शांत आहे. शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूर शहरातील एक देखणे ठिकाण प्रत्येकाने एकदा पहावे असेच आहे..

©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.
९६५७७४४२८३.

Wednesday 26 June 2019

पैसा झाला मोठा...! By Umakant Chavan

पैसा झाला मोठा..! By Umakant chavan

©उमाकांत चव्हाण..

काल एका ग्रुप मध्ये हरिहर किल्ल्याचे काही फोटो आले. जवळपास दीडशे ते दोनशे लोकांची जत्रा या किल्ल्यावर वेगवेगळ्या संस्थांनी आणली होती.

मी स्वतः ट्रेकर आहे, त्यामुळे किल्ल्याबद्दलचं प्रेम मला चांगलंच माहित आहे. पण दोनशे ते अडीचशे लोक एका वेळेस एखाद्या किल्ल्यावर...? ते देखील हरिहर सारख्या किल्ल्यावर नेणं हे कितपत योग्य आहे ? यावर प्रश्नचिन्ह उभे राहते..

खरंतर बऱ्याच वेळेस आपण बघतो की किल्ले भ्रमंती, गडकोट फिरणे आणि ट्रेकिंग या गोष्टी आता घराघरात पोहोचलेल्या आहेत. पूर्वी ट्रेकिंग करणे किंवा किल्ले फिरणे या गोष्टी ठराविक लिमिटेड समाजापुरतेच मर्यादित राहिले होते. एक तर असे ट्रेक करणारा श्रीमंत वर्ग असायचा किंवा भटके लोक असे ट्रेकिंग करायचे. याव्यतिरिक्त एक वेगळा ग्रुप होता जो म्हणजे "शिवप्रेमींचा" ! ज्यांच्या मनात किल्ल्याबद्दल अतिशय निकटता असायची ते लोक हे गड-किल्ले अक्षरशः वेड्यासारखे फिरायचे... पण आता तुम्ही ट्रेकिंग करत आहे म्हणजे तुमचा "स्टेटस सिम्बॉल" झालेला आहे, म्हणूनच कित्येक शेकडो तरुण-तरुणी, वयस्कर व्यक्ती आज-काल ट्रेकिंगला जातात...

ट्रेकिंग करणे हे अतिशय चांगलंच आहे. यात कुठलाही वाद नाही, पण ट्रेकिंगला जाताना योग्य त्या गोष्टींची काळजी घेणे, हे देखील तितकंच खरं आहे.. उदाहरणार्थ आपण ज्या किल्ल्यावर जातो किंवा ज्या जंगलात जातोय, त्या जंगलाबद्दल परिपूर्ण माहिती असणारा एक गाईड आपल्यासोबत निश्चितच हवा...

दुसरं म्हणजे आपण पण ज्या भागात जाणार आहे तिथे जाताना तिथला हवामान, तिथली नैसर्गिक संसाधने, तिथली बायोडायवर्सिटी, तिथं असणारे वेगवेगळे वन्यजीव, पुढे फ्युचर मध्ये येण्याजाण्याचे रस्ते, या सगळ्या गोष्टींची देखील तितकीच माहिती हवी....त्याव्यतिरिक्त ट्रेकिंगला जाताना एक ग्रुप जास्तीत जास्त आठ ते दहा लोकांचा असावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. (ट्रिप वेगळी) जर तुम्हाला शंभर-दीडशे लोकांना घेऊन जायचं असेल तर अशा ठिकाणी ट्रेकिंगला गेलेले चांगले की, जिथे काहीही अपाय होणार नाही किंवा त्या लोकांना सहज नेता येईल व सहज आणता येईल...

हरिहर सारख्या किल्ल्यावर दीडशे-दोनशे लोक घेऊन जाणे किंवा कलावंतीन दुर्ग दोनशे जणांना घेऊन चढणे म्हणजे अक्षरशः मूर्खपणा आहे असे मला वाटते... कारण की या किल्ल्यांची जी धार आहे आणि जो चढ आहे तो अतिशय तीव्रतेचा आहे शिवाय या किल्ल्यावरून तोल गेला तर निश्चितच मोठा अपघात होण्याची चान्सेस जास्त आहेत, अशा किल्ल्यांवर आठ दहा जण घेऊन जाणून सुद्धा खूप मोठी रिस्क आहे त्या किल्ल्यांवर काही ग्रुप आणि होशी पर्यटन मंडळी जी माणसं उत्साहाने भरलेल्या मुंबई-पुण्यात दोनशे लोक घेऊन हरिहर सारख्या किंवा कलावंतीन सारख्या किल्ल्यांवर जातात... त्या लोकांना फक्त एकच सांगणे आहे किल्ले संरक्षित ठेवा... ते देशाचं सौंदर्य आहे..

किल्ले आणि असे जंगलातले ट्रेक्स खूप गरजेचे आहेत कारण की तुम्हाला तिथे गेल्यानंतर आत्मिक ऊर्जा मिळते, मन हलक होतं. पण त्या ठिकाणी तुम्ही जर कमर्शियलायझेशन केले तर निश्चितच या भारतात शांत राहण्यासाठी एक देखील ठिकाण मिळणार नाही. सध्या माऊंट एव्हरेस्ट ची जत्रा भरते ती पाहिलीच की..! महाराष्ट्रात कळसुबाई, हरिहर किल्ला, कलावंतीण दुर्ग, नाणेघाट, जीवधन, कर्नाळा, सिंहगड, तोरणा, राजगड, रायगड आणि लिंगाणा या किल्ल्यांवर आजकाल ज्या जत्रा भरत आहेत त्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं, कारण की एकतर हे किल्ले खूप दुर्गम होते. "दुर्गम तोच दुर्ग, रस्ते करणे म्हणजे किल्ल्याच्या दुर्गामतेला सुरुंग लावणे".. तिथे जाताना माणूस चार वेळा विचार करत होता. शिवाय या किल्ल्यांची जी दुर्गमता होती ती अवर्णनीय होती...पण आता जस ताडोबाच्या वाघाचं मांजरं झालीत तसं या किल्ल्यांचा कचरा केलेला आहे आणि हे पाहून खरंच मनात इतका प्रचंड राग येतो...

यावर कधीतरी बोलावसं वाटतं कारण की हे किल्ले म्हणजे एक पवित्र ठिकाण होती. तिथं आता सध्या कुरकुरे, प्लास्टिकच्या पिशव्या, काही किल्ल्यांवर दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे बॉटल्स आणि प्रचंड कचरा पडलेला असतो...!

आता प्रश्न राहिला हा कचरा उचलायचा कोणी ? तर हा कचरा आणि ही किल्ले गडकोट साफ करण्यासाठी बरेच ट्रेकर मंडळी देखील हातभार लावतात. खूपशी मंडळं मला माहिती आहेत किंवा बरेच लोक मला माहिती आहेत की जे लोक दर महिन्याला जाऊन किल्ले साफ करत आहेत...

माझा स्वतःचा ग्रुप सुद्धा बऱ्याच वेळा स्वच्छ तेच मोहिमेसाठी जातो, पण मला या सगळ्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो (माझ्या स्वतःच्या ग्रुप बद्दल देखील हेच माझं मत आहे) की का आपण किल्ले स्वच्छ करायचे ?

"माझा किल्ल्या स्वच्छ करण्याला विरोध नाहीये, माझा किल्ला घाण करण्याला विरोध आहे".. रोग झाल्यानंतर औषध देऊ नका... रोग होऊनच देऊ नका..!त्याच्यासाठी योग्य ती काळजी घ्या. किल्ल्यावर घाण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट कळाली पाहिजे की आपले किल्ले म्हणजे आपली "राष्ट्रीय धरोहर" आहेत ते जर तुम्ही घाण केलेत तर निश्‍चितच तुमची भावी पिढी तुम्हाला शिव्याच घालणार....

दुसरी गोष्ट म्हणजे किल्ल्यांवर आजकाल होणारे इव्हेंट... ! किल्ल्यावर ज्या वेळी २०० पब्लिक राहायला जातं त्यावेळेस त्या किल्ल्या शहर स्वच्छतेचा प्रश्न उभा राहतो २०० लोकांना प्रातविधी करण्यासाठी जी जागा लागते त्या जागेवर अक्षरशः कुजलेल्या कचर्यासारखा वास येतो. म्हणजे तुम्ही किल्ला घाण करत आहे, हे देखील लक्षात ठेवा !

एक किल्ला पाहताना आपण एक इतिहास जगत आहे ही गोष्ट लक्षात ठेवा..!

आज-काल पर्यटन नावाचं भूत महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातल्या मंडळींच्या मानगुटीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात बसलेलं आहे.

माझा पर्यटनाला विरोध नाहीये किंबहुना मी स्वतः ते खूप फिरतो, पर्यटन देखील करतो, मला फिरायला आवडतं पण याचा अर्थ असा नाही की दर शनिवारी-रविवारी मित्र मंडळ यांनी फॅमिली घेऊन बाहेर गेलेच पाहिजे...

वेळ घरात जात नाही असंही नसत, फॅमीली सोबत असताना एकत्र राहू शकता... मग कुठलेही ठिकाण असो. पण आज-काल नाणेघाट, हरिशचंद्र, रतनगड, कळसुबाई, जीवधन, माळशेज, कलावंतीण, राजमाची, ताम्हिणी, वरंधा, प्रतापगड, वासोटा, कोयना, आंबा, आंबोली, राधानगरी यासारख्या ठिकाणी पर्यटकांची इतकी गर्दी झालेली असते की असं वाटतं की महाराष्ट्रातले सगळे पर्यटक याच घाटात येऊन बसलेत..

कधीकधी वाटतं महाराष्ट्र रिकामा पडलाय प्रत्येक शनिवारी-रविवारी..! चुकून एखादा अपघात झाला तर सगळे इमरजेन्सी सर्व्हिसवाले ट्रेकला किव्हा फिरायला..!

लोकं म्हणतात, शेतकरी आत्महत्या करतात, देश गरीब झालय, पैसा नाही, नोटबंदी झाली, धंदा नाहीये, नोकऱ्या नाहीत, मग भरमसाठ किमतीचे कॅमेरे आणि इतकं ओव्हरलोड पर्यटन व चंगळवाद कसा काय उभा झालाय ? पैसा नाही कुठे ?

दर शनिवारी-रविवारी माणसं हॉटेलमध्ये जेवायला जातात.. एका ताटाचे बिल दोनशे रुपये असतेच.. पाच माणसे धरली तर हजार रुपये खर्च होतात... फक्त एका वेळेच्या जेवणावर चार आठवडे जर पकडले तर चार हजार रुपये...? एका फॅमिलीचा फक्त बाहेरच्या जेवणाचा खर्च...?

जे जेवण तुम्ही घरात करू शकता, तरीदेखील तुम्ही बाहेर जात आहे, म्हणजेच पैसा आहे आपल्याकडे ! तुम्ही पैसे खर्च करतात... भ्रमंती आणि पर्यटन ही वेगळी गोष्ट आहे आणि समाजाला दाखवण्यासाठी केलेली "एन्जॉयमेंट" ही वेगळी गोष्ट आहे...!

या दोन गोष्टी खूप मोठी तफावत आहे, या दोन गोष्टी कधीही एकत्र करू नका.. पर्यटन निश्चित करावं, बाहेर जेवायला जा, फिरा, एन्जॉय करा पण त्याला लिमिटेशन्स असाव्यात...

निसर्ग खूप मोठा आहे, हे सगळं अति झाल्यावर कधी ना कधी सर्वांनी तो बाऊन्स करणार,  आणि हे निश्चितच होणार आहे. प्रत्येक गोष्टीची एक कॅपॅसिटी असते.

गेल्या शनिवारी रविवारी आंबोलीत हजार माणसं... जवळजवळ तीनशे चारशे फोटोग्राफर रात्रीचे बेडूक शूट करत होती, काय चाललय काय ? आणि काय करताय ? लोकांना फक्त फेसबुक व्हाट्सअप वर दाखवण्यासाठी त्याचा उपयोग काय होतो ! (माहिती कुठे आहे ? ना त्यांच्या रक्षणार्थ काही भरीव काम होतेय ?) या गोष्टी देखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे...(स्थानिक पर्यटन आणि रोजगार होतो ही चांगली गोष्ट आहे पण निसर्गाची काय अवस्था ? आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच ना ? मग जे सुंदर आहे ते पाहायचं का, आहे म्हणून कितीही कसही वापरायचं ?)

माणसांच्या चैनीखोर वृत्ती वाढलेली आहे आणि त्याचा फटका निसर्गाला बसत आहे... मग तो कुठल्याही प्रमाणात असो... दर शनिवारी-रविवारी सगळे धबधबे ओव्हरलोड होतात, इतक पब्लिक असतं की शांति आणि निसर्गाची एकाग्रता कुठलेही धबधब्यात पाहायला मिळत नाही...

एक वेळ होती जेव्हा धबधब्याचा नाद एकटा शांत ऐकयचो... तिथं विलासी आणि चैनीखर वृत्ती पण वाढ झालेली आहे आणि चंगळवादी पर्यटन चालू आहे. त्या पर्यटनाचा फटका कधी ना कधी निश्चितच महाराष्ट्राला खूप मोठा भोगावा लागणार आहे, कारण की निसर्ग जितकं देतो त्याच्यापेक्षा कितीतरी पट घेतो..! ही गोष्ट कायम लक्षात ठेवा..! शिवाय असल्या अघोरी आणि चंगळवादी पर्यटनामुळे निसर्गाचा प्रचंड प्रमाणात ह्रास होतो आहे, ती जबाबदारी देखील आपण टाळत आहे !

गरज आहे का इतकं सगळं करण्याची ? याआधी देखील आपण आनंदी होतोच की, गल्लीतले खेळ, मित्रांसोबत गप्पा विसरलो का आपण ? शेवटी आता पैसा झाला मोठा..!

एकदा या गोष्टीवर विचार जरूर करा...!

©उमाकांत चव्हाण,
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.

 photo fb kadun sabhar








Monday 22 April 2019

भटकंती काळानंदीगडाची - उमाकांत चव्हाण




काळानंदिगड हा चंदगड तालुक्यातील एक देखणा किल्ला ! गेले १२ ते १५ वर्षे सतत या किल्ल्याला ३ ते ४ महिन्यातून एकदा भेट होतेच ! आज वेळ मिळाला आणि धावपळीत का असेना पण एकटा जाऊन बसलो त्याचा कुशीत !
गावाजवळच्या धनगरवाड्याजवळ गाडी लावली आणि गडाच्या अंगाखांद्यावर बागडायला सुरुवात केली, तशी गाडी वरपर्यंत गेली असती पण मला किल्ला चालत वर चढायला आवडते, आणि मी किल्ल्यावर रस्ता करायच्या मतप्रवाहाच्या विरोधी आहे, किल्ल्यापर्यंत रस्ता करा पण वरती एकदा का गाडी गेली की मग सुरू होतो त्या किल्ल्याचा बाजार ! प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, पत्रावळ्या, लेहेज कुरकुरेचे प्लास्टिक आणि पिशव्या !
खरच एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघा की गडावर रस्ता करायची खरंच गरज आहे ?
काळानंदिगड हा इतिहासाच्या पुस्तकात नोंद केलेल्या किल्यांपैकी एक ! काळानंदिगडाचा उल्लेख सभासद बखरीत येतो. या बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा या किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. गडाच्या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो.
युद्धनीतीमध्ये शत्रूच्या आक्रमनाचा मुकाबला करायचा असेल तर प्रथमतः आपल्या स्वतःच्या घराची मजबूती करावी लागते. काळानंदिगडाची मोक्याची जागा पाहता गोवा, कर्नाटक, सावंतवाडी प्रान्तातील असलेल्या शत्रुंवर नजर ठेवण्यासाठी व टेहळनीसाठी हा गड वसवलेला असावा.
गडफेरीला म्हणाल तर एक तास पुरेसा होतो पण मी एकटा आलो की ३ ते ४ तास हा हा म्हणता निघून जातात. त्याला कारणच तसे आहे, हे कातळ माझ्याशी बोलतात ! गोनीदांचे दुर्गप्रेमींना एक पत्र आहे त्यात त्यांनी गड कसा पहावा याचे तंत्र सांगितले आहे. ते म्हणतात, तो धावता पळता पाहता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलिक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्टया त्याचं महत्व, त्यांच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंड, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखर, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरुज त्यांची प्रवेशद्वारे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरच त्याचं महत्व ध्यानी येतं. नाहीतर आजकाल अर्ध्या दिवसात रायगड पाहणारी मंडळीही आहेत.

महाराष्ट्राचे लाडके भाई, पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्‌टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्‌टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.ल. देशपांडे यांना कलानिधीगडकर या नावाने हाक मारीत असत.
गडावर जर जायचे म्हंटले तर कलीवडे या गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग लागतात. एक मार्ग चारचाकी जाऊ शकेल असा आहे पण हा मार्ग पूर्णतः कच्चा आहे आणि दुसरा खुशकीचा अगदी गडकरी किव्हा ट्रेकर्स यांच्या सोयीचा ! पायी चालत गेल्यास साधारण एक तासात गडावर जाता येते.
गडाच्या पश्चिमेस तिल्लारी घाट, रामघाट व रायबाचा पारगड, ताम्रपर्णी नदी, उत्तरेस गंधर्वगड व सह्याद्रीच्या घनदाट पर्वतरांगा आहेत, दक्षिणेस तिलारी नदी, झाबंरे धरण प्रकल्प आहे. या गडास नैऋत्य दिशेकडून पाहिले तर बैठ्या नंदी सारखा दिसतो याचमुळे गडास काळानंदिगड किव्हा कलानिधिगड या नावानेही संबोधले जाते.
गडावर जांभाच्या दगडात लांब अशा ऐतिहासिक कालीन वाडयाचे अवशेष पाहायला मिळतात. कलानिधीगडाचे प्रवेशद्वार लहान असले तरी फारच देखणे आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. एका भागात दूरसंचारचा मनोरा आहे व उर्वरित भागात गडाचे अवशेष आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ एकेकाळी शौर्य गाजवलेल्या दोन तोफा आपले स्वागत करतात.
गडावर भवानी देवीचे मंदिर असुन या मंदिरातच शिवलिंग व श्री गणेशाची पुरातन मूर्ति आहे. या मंदिरासमोर एक जुनी समाधी आहे.
गडावर असलेल्या बीएसएनएल टॉवरच्या पाठीमागे पुरातन विहीर असुन यामध्ये वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे. या विहीरीलगतच भुयारी मार्ग आहे. लागुनच दक्षिणेला धाकलागड आहे. 'धाकला' म्हणजे लहान असा अर्थ होतो.
गडावरील मंदिरे पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायर्‍यांचा मार्ग खोल विवरात उतरताना दिसतो. येथे एका चौकोनी हौदात दोन विहिरी खोदलेल्या पहावयास मिळतात. यातील एक विहिर झाडांनी भरुन गेली होती सध्या त्याची डागडुजी चालू असल्याने आता ती सुस्थितीत दिसते, तर दुसरी विहिर वापरात आहे. या विहिर संकुलात अनेक पायर्‍या, देवळया व चौथरे इत्यादी दिसतात. विहिर संकुल पाहून आपण गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढूूनकाळानंदड
 पुढे चालत गेल्यावर येथील उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या ठिकाणी एक भव्य बुरुज लागतो. यापुढील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी वाट बनवलेली दिसते. जवळ जवळ हा थोडा भाग सोडला तर संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे.
टॉवरकडील तटबंदीमध्ये आपणास जागोजागी शौचकूप दिसतात. हे शिवकालीन शौचालय आपल्याला गडाची स्वच्छता कशी ठेवावी याचे उदाहरण घालून देते. शेजारीच आपणास जुना वाडा दिसतो. गडाच्या पूर्व बाजूला ताम्रपर्णी नदीच्या नागमोडी पात्राचे मोहक दर्शन होते.

©उमाकांत चव्हाण
सह्याद्री संवर्धन केंद्र.
Umakant chavan
9657744283

Friday 19 April 2019

Environment and Human living and wildlife with health.. by - Umakant Chavan

माझी तरुण पिढी मला कायम प्रेरणादायी आहे, त्यांना शिकवणे, समज देणे, आरोग्य, पर्यावरण आणि संस्कार यांची सांगड घालून त्यातून ट्रेक्स, निसर्ग, आत्मिक आंनद आणि समाधान, आणि या सर्वातून देश आणि राष्ट्र याची जाज्वल्य भक्ती हीच माझी देशाप्रती असलेली श्रद्धा असे मी मानतो..

भारतात देशप्रेम शिकवावे लागत नाही, रक्तात आहे ते,

भले काहींच्या मते थोडे रक्त खराब झाले असेलही (असेही नमुने आहेत की, ज्यांना ना देशाची काळजी ना स्वतःची) ! पण देशप्रेम आणि देशभक्ती ही भारतीयांच्या नसानसात आहेच !

आज पुन्हा एकदा या चिमुखल्यांच्या रूपाने मला ते माझ्या भावी पिढीमध्ये दिसले...

Environment, treks, physical fitness and awareness lecture held on New model English school, Kolhapur.

#imindian
#ilovemycountry
#umakantchavan
#oscorpinfomedia

Thursday 18 April 2019

पर्यावरण संरक्षण कार्यशाळा ! देवराई आणि अधिवास !



It's amazing experience to Inaugurate of poster and Model exhibition of Environment awareness program 2019, DYP engineering college Civil Dept, arranged by HOD Prof. M.J.Patil sir, Co-ordinator Prof. Prajakta Altekar, and Prof. Nandini Misal along with entire team of Civil Dept students and all staff members.

विद्यार्थ्यांना आज पर्यावरण काय आहे हे मुळापासून शिकवणे खूप गरजेचे आहे, कारण आजूबाजूला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही जुन्या पिढीने खराब करूनच आताच्या या पिढीला दिलेली आहे. मग ती त्यांना जपायला सांगणे योग्य वाटते का ? का आपणच पहिलं या कार्याची सुरुवात करून मग त्यांना तो वारसा पुढे चालवण्यासाठी मदत करूया ?

मला असं वाटते की या येणाऱ्या नवीन पिढीला फक्त दिशा देण्याची गरज आहे त्यांच्यामध्ये आग तर भरभरून आहे फक्त त्या आगीचा वनवा न होता त्या अग्नीला योग्य दिशा मिळाली तर निश्चितच आपण पर्यावरण संरक्षण करता थोडाफार सहभाग घेऊ शकतो..

वाइल्ड लाईफ, वन्यजीवांचा अधिवास आणि देवराई या माझ्या हक्काच्या विषयात थोडेफार नवपण घेऊन डी वाय पाटील इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणातील एक नवीन विषय समजावून सांगताना आलेले नवीन अनुभव ...!

© Umakant chavan
#umakantchavan
#sahyadriconservationsociety
#sahyadri
#oscorpinfomedia

Thursday 11 April 2019

सर्पमित्र आणि वन्यजीव प्रेमींना एक संदेश !


फक्त वन्यजीव वाचवणे म्हणजे आपले काम नाही, तर वन्यजीवाच्या बरोबर स्वतःचे संरक्षण करणे आणि त्या वन्यजीवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देणे हे काम जर आपण वन्यजीव प्रेमी म्हणून चांगल्या पद्धतीने केले तर निश्चितच वन्यजीवांना मदत होईल..!

नियतीने अखेर फास आवळला ! पण नक्की कुणाचा ?


©उमाकांत चव्हाण,
"नियतीने अखेर फास आवळला..!" असा मेसेज कालपासून प्रत्येक जणाच्या व्हाट्सअपवर, प्रत्येक ग्रुप मध्ये फिरत आहे.

केपटाउन या दक्षिण आफ्रिकेतील शहरात पाणी पूर्णपणे बंद झाले. किव्हा जगातलं पहिलं पाणी विरहित शहर म्हणून केप टाऊनला घोषित केले गेलं, अस आपल्याला व्हाट्सप च्या माध्यमातून कळलं !

पण खरच का हो हे असं झालंय ?

केपटाउन चा इतिहास तुम्ही पाहिला तर केपटाउन हे पृथ्वीच्या अगदी खालच्या बाजूला असलेले एक सुंदर शहर..! पर्यटनासाठी भरपूर लोक कायम इथं येत जात असतात. तुम्ही फोटो पाहिले तर अक्षरशः केपटाऊनच्या प्रेमात पडल इतकं सुंदर शहर..! 2013-14 साल या शहरातील किंबहुना या आसपासच्या परिसरातील पाण्याची पातळी हळू कमी होत गेली, त्याचे आकडे सोबत दिलेले आहेत.2014-15-16 या सालात हीच पातळी ज्याला आपण भूजलपातळी म्हणतो ती इतक्या प्रमाणात खाली गेली ही जवळजवळ पाण्याचे दुर्भिक्ष जाणवलं आणि पाणी कमतरता सुरू झाली.

कदाचित तुम्हाला आठवत असेल आपल्यातले काही क्रिकेटर दीड-दोन वर्षांपूर्वी क्रिकेट खेळायला गेले होते त्यावेळी आपण पाणी जास्त वापरतो म्हणून आपल्याला कमी पाण्यात आंघोळ करा म्हणून सांगण्यात आलं होतं ही न्यूज ही प्रत्येक चॅनलवर व्हायरल झाली होती.

मग हा मेसेज आजच का व्हायरल व्हावा ?

प्रत्येकाला वाटतं आपल्या भागात दुष्काळ आहे आणि आपण पाणी जपून वापरले पाहिजे पण खरंच अस वाटतं का बघा आठवून ? बघा जर आपण पाणी कसे वापरतो..?

पाण्याची उधळपट्टी करण्यात आपण खूप एक्सपर्ट आहे..! गाड्या धुणे, कुत्री मांजरे धुणे, म्हशी-गुर धुणे, उरलं तर बागेत पाणी मारणे, गरम होते म्हणून गच्चीवर पाणी मारणे, पाइपच्या पाईप झाडांच्या फांद्यामध्ये टाकून निघून जाणे, पाणी वर येईपर्यंत नळ बंद न करणे, गटरांमध्ये मध्ये पाणी वाहत सोडणे, काही नसलं तर भांडी धुणी काढा आणि गरम होतंय रस्त्यावर पाणी मारणे ह्या गोष्टी आपण सर्रास पाहतोच ना ?

आपल्या भागात, आपल्या आजूबाजूला हे आपल्याला होताना दिसते आणि आपलेच लोक करतात हे सगळं..! फक्त मेसेज फॉरवर्ड केले की "पाणी वाचवा...!" की झालं का आपलं काम ?

कधीतरी, काहीतरी महत्वपूर्ण सामाजिक संदेश देणारा मेेेसेज येतो. जो पाहतो तो दोन मिनिटे वरून नजर फिरवतात हेडलाईन वाचतात मेसेज कॉपी करतात आणि देतात ढकलून पुढं !

कुणासाठी करतोय ? काय करतोय ? याचं थोडही भान नसताना !

आम्ही खूप सधन भागात राहतो, आजूबाजुला खूप धरणं आणि बंधारे आहेत आणि धरणात भरपूर पाणी साठा आहे, म्हणूण, आम्ही काय केलं ? तर आमची चांगली सुपीक जमीन होती त्या जमिनीत उसाचे पीक घेतलं. काळ्या मातीत ऊस होताच, आता डोंगरावरही ऊस लावला. त्या उसाला भरपूर पाणी पाजायच, इतकं पाणी पाजायचं की, पाणी बांधातून ओव्हरफ्लोव्ह झालं पाहिजे. प्रत्येकाच्या शेतातून  ते रस्त्यावर वाहताना दिसले पाहिजे, तेव्हा आम्हाला कळणार की आमच्या ऊसाला पाणी पुरेसं झालं...!

उरलं तर आहेच की दुसऱ्या पिकांना..!!

आमच्याकडे जास्त पाणी आहे, म्हणून आम्ही जास्त युज करतो, पण लोकांना हे कळत नाहीये की जिथे पाण्याचा थेंब न् थेंब महत्त्वाचा आहे, तिथले लोक एक वाटीभरून पाणी फेकून देताना सुद्धा चार वेळा विचार करतात..! याउलट आम्ही काय करतो..? तर उधळपट्टी...!

आहे त्या गोष्टीचे संवर्धन करणे किंवा साठवून ठेवणे किंवा त्या गोष्टीचा मोल जाणणे ही खरी गरज आहे ना..? की केपटाऊनमध्ये पाणी कमतरता झाली म्हणून आम्ही मेसेज करतोय...?

आमचे मित्र मेसेज चांगला आहे म्हणून फॉरवर्ड करतात, पण त्यांना मेसेज मधला मतितार्थ जाणून तस वर्तणूक करायला खरंच जमतं का ? आणि खरच जर मनापासून तो मेसेज तुम्ही वाचून फॉरवर्ड केला असाल तर निश्चितच उद्यापासून पाणी वापरताना चार वेळा विचार करा...! की आपण पाणी वापरतो त्या पाण्याचं मोल काय आहे ?

माझा हा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्याला विरोध नाहीये, माझा विरोध आहे असले मेसेज फॉरवर्ड करून विसरून जाणाऱ्या माणसाला...!!
(काल एकाने हा मेसेज फॉरवर्ड केला आणि तोच दुपारी पाईपने स्वतःची कार धुताना दारात मला दिसला)

केपटाउन मधली पाण्याची परिस्थिती आहे हे गेले चार-पाच वर्षे अशीच चालू आहे, आता ते फक्त हायलाईट झाले एवढेच मला सांगायचे आहे. याच्या आधीही अशीच कंडीशन होती आणि फक्त केपटाऊनच का ? जगातली कित्येक शहरात असेच पाण्याचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, आणि हे प्रॉब्लेम आत्ता चालू झालेले नाहीत. विदर्भात जाऊन किंवा मराठवाड्यात जाऊन पहा दुष्काळ म्हणजे काय असतो केपटाऊन चे फोटो पाहून केप टाउन ची बातमी स्प्रेड करण्यापेक्षा आपल्या भागात जे झाले आहे एकदा बघा आणि स्वतः बदलायला शिका! कारण आपल्याकडे आहे म्हणून आपण भरपूर वापरतोय पण ज्या दिवशी संपेल ना त्यादिवशी मेसेज वाचण्यासाठी सुद्धा डोळ्यात पाणी शिल्लक राहणार नाही !
पाणी खरच बहुमोल आहे त्याचा वापर चांगला करा जिथे गरज आहेत जितकी गरज आहे तितकच पाणी वापरा, कारण कोणीतरी म्हणला आहे तिसरे महायुद्ध हे फक्त पाण्यामुळे होणार आहे !

Friday 5 April 2019

गुढी उभी करा आनंददायी ! पर्यावरण पूरक !

गुढीपाडवा स्पेशल

मित्रांनो,
आपण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करत असतो, नविन वर्षाचा आनंद, घरात पुरणपोळी आणि साखरगाठी खाऊन तोंड गोड करतो, संध्याकाळी गुढी उतरली आणि काठी माळावर टाकून देतो, काही ठिकाणी ज्या काठीवर आज साडी असते त्याच काठीवर दुसऱ्या दिवसापासून कपडे येतात. असो..!

आपण सारे भारतीय सण आणि उत्सव आपण खूप चांगल्या पद्धतीने साजरे करतो. पण आज-काल जी शो ऑफ किंवा दिखावा करायची पद्धत आपल्या समाजात रुळलेली आहे ती खरे तर खूप चुकीची आहे.

आपले सण आणि उत्सव हे कायमच पर्यावरण पुरक होते आणि राहतील, पण त्या मध्ये काही जणांनी जे काही नवीन नको असलेल्या पद्धती घुसवल्या आहेत ते नक्कीच चांगले नाहीये.

दरवर्षी दसऱ्याला कोल्हापूर मध्ये १७ ते १८ टन आपटा तुटतो, जो संध्याकाळी रोडवर पसरलेला असतो, अगदी काही तासातच !

खरे तर पांडवांनी शस्त्रे शमी च्या झाडावर लपवली होती, कालांतराने शमी ची झाडे कमी झाल्यामुळे आपण आपटा वापरू लागलो, आणि आता आपण आपटा कमी झाल्यामुळे कांचनारची पाने वापरतोय.

वास्तविक हा तुटलेला आपटा आपण गाई आणि म्हेशींसाठी वापरू शकत होतो, आपट्याच्या पानामुळे जनावरांच्या दुधात वाढ होते.

आता पण सध्य स्थिति वेगळी नाहीये. कोल्हापूर मध्ये आणि आसपास जवळ साधारणतः ४ लाख गुढ्या उभा राहिल्या आणि तेवढेच बांबूं तुटले गेले व कडुनिंबाची झाडे पण तुटलीत.

बांबू आणि तत्सम वर्गीय वनस्पती हे हत्ती आणि गव्यांचे खाद्य आहे, तसेच पर्यावरणासाठी सुद्धा हि झाडे महत्वाची आहेत, पण आता बांबू व तत्सम झाडे कमी झाल्याने वन्यजीवांच्या अस्तित्वावर गदा आलेली आहे.

शिवाय आपल्याला हे माहित आहेच की पश्चिम घाटात कडुनिंबाची झाडे येत नाहीत जी फक्त माळरान किंवा सपाटीवरच येतात, आजकाल उन्हाचा तडाखा किती वाढला आहे हे पण आपण पाहताच आहे, कडुनिंब एक औषधी झाड आहे जे उपयोगी आहे तसेच गरजेच्या वेळी माळरानावर उन्हापासून वाचण्यासाठी सुद्या उपयोगी पडते,आणि अश्या प्रकारे जर आपण जसे तोडायची ठरवली तर मग आधीच वाढलेल्या ठिकाणी जमिनीची धूप वाढेल आणि तापमान पण वाढणार.

मी संस्कृतीच्या विरोधात नाहीये पण संस्कृतीच्या नावाखाली जे विकृतीकरण चालू झालय ते मला पटत नाही. याचा अर्थ असा नाहीये की गुढ्या उभ्याच नका करू, त्यापेक्षा एक काठी किती दिवस वापरता येईल याकडे लक्ष द्या आणि शक्य झाल्यास फक्त झाडे तोडणे कमी करा, लावायची तशी पण कोणती ते बऱ्याच लोकांना माहीत नसते !

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि उत्सव पर्यावरण पूरक आहेत आणि अशी संस्कृती जगात सर्वमान्य झालेली असताना आपण त्या संस्कृतीमद्ये विकृती का निर्माण होऊ देतोय हे मला कळतं नाहीये ?

गुढी पाडव्याच्या एक बांबु किमान ६ ते ७ वर्ष तरी चालू शकतो, माझ्या स्वतःच्या घरातील गुढीची काठी गेली १० वर्षे झाली आम्ही वापरतोय, दर वर्षी नवीन काठी घ्यायचा अट्टाहास का..? आणि मार्केट मध्ये सण आणि उत्सवाचे जे बाजारीकरण झालंय ते कधी थांबणार..?

(गुढीची काठी घेताना बऱ्याच जणांना काल परवा हा अनुभव आलेला असेलच)

आपण आपले सण आपली संस्कृति जतन केलीच पाहिजे पण मूळ बेसिक गोष्टी समजून ती आहे तशी ठेवणे हे आपले कर्तव्य नाही काय?

चूक भूल दयावी घ्यावी पण मनात आले म्हणून एवढा मोठा लेख लिहिला..!  कारण मला तर या वर्षी उन्हाळा खूप जाणवतोय..!

आपला,
उमाकांत चव्हाण,
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.

Thursday 28 March 2019

शिवरायांचे जलव्यवस्थापन !! © उमाकांत चव्हाण.

शिवरायांचे जलव्यवस्थापन..!!

©उमाकांत चव्हाण.

आपला देश नैसर्गिक साधन संपत्तीने विपुल असा देश आहे. वने, पर्जन्य जैयविविधता यामुळे समृद्ध असलेल्या देशातील आपली शेती बऱ्यापैकी मोसमी वाऱ्यावर अवलंबून आहे. त्यात भारतात सरासरी पावसाचे प्रमाणही चांगले आहे, पण परंतु या पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे हे पाणी जमिनीवर पडून वाहून जाते. ते अडवले जात नसल्यामुळे ते थेट नदी, नाले किंवा समुद्राला जाऊन मिळते. त्याचा काहीच फायदा आपल्या लोकांना होत नाही.

आज सारा महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण फिरतोय, पण शिवछत्रपतींच्या गडकोटांवर अजून देखील पाणी उपलब्ध आहे. "गडावर उदक पाहून उन गडू बांधून घ्यावा" हे आज्ञापत्रातील वाक्य आजही आपल्याला तंतोतंत लागू पडते.

एका पुस्तकात लिहले आहे की, रायगड किल्ल्यावरील सर्व पिण्याची टाकी आणि तलाव व्यवस्थित साफ करून पाण्याचे योग्य असे व्यवस्थापन केले तर आजूबाजूच्या शंभर गावांना बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा करता येईल असे जवळपास ३८५ किल्ले महाराष्ट्रात आहेत ३८५ पैकी जवळजवळ ७०% किल्ल्यावर बाराही महिने पाणी साठा असतो अगदी भर उन्हाळ्यात देखील पाणी असते पण आपल्या देखभाली मुळे तलाव आणि टाक्यांमध्ये गाळ आणि कचरा साचून दुर्गंधी पसरलेली आहे ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी जे जाणवले ते आज आपण अंमलात देखील आणू शकत नाही.

शिवरायांनी  आपल्या कालखंडात देखील शेतीच्या पाण्याचे अगदी  पुरेपूर नियोजन केले होते, पण आज आपल्याकडे शेतीला पावसाळय़ात मिळणारे पाणी ही जमेची बाब सोडली तर पावसाचा फारसा उपयोग होत नाही किंबहुना तो करता येत नाही, कारण शेतीसाठी पाऊस हे समीकरण मान्य केले तरी इतर सगळ्या गोष्टींसाठी पाणी लागते, हे समीकरण लोक मान्य करायला तयार नाहीत. त्यांची तशी मानसिकता बनत नाही, ही भयंकर गोष्ट आहे.

गिरिदुर्ग भटकणारे किंवा ट्रेकर्स यांना कदाचित आठवत असेल की, महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व किल्ल्यांवर पाण्याचे साठे आढळतात. यामध्ये अगदी उन्हाळ्यात देखील पिण्याचे पाणी असते. त्याचे नियोजन, त्याची बांधणी, पाणीसाठा इतका अप्रतिम ठेवला गेला आहे की अजून पुढे कित्येक वर्ष या बावडीत किंवा विहिरीत पाणी शिल्लक राहील आणि ते पाणी आजही चवीला तितकच सुमधुर आणि थंड आहे.

शिवकालीन समाजव्यवस्थेत  कूळ कायद्याने जमीन कसणे ही एक पद्धत होती शिवाय त्या जमिनीतील पाण्याचे नियोजन हे  गावातले लोक एकत्र मिळून करत  त्यांना सरकारी दरबारातून मदत होत असे, पण पाण्याचे नियोजन करण्यात गावकऱ्यांचा व रयतेचा  सहभाग होता. आपल्याकडे आत्ता गेल्या काही वर्षात लोकांचा सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता वाढलेली आहे. सरकार करेल, त्यांनी करावे, अशी मानसिकता आता कालबाहय झाली पाहिजे.

शेतीसाठी जसे पाणी लागते त्याच प्रकारे घरगुती आणि घराबाहेर उद्योगधंदे तसेच इतर वापरासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. पण शेतीशिवाय विहिरी, धरणे, कालवे यांच्यात पावसाचे पडणारे पाणी असते. त्या व्यतिरिक्त शहरे आणि ग्रामीण भागांसाठी वर्षभर पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे, ते होत नाही.

आपल्याकडे जल प्रदूषणाचे प्रमाण इतके वाढलेले आहे की, त्यामुळे देशभरातील नद्या, कालवे आणि शहरांच्या मध्यभागी असलेल्या विहिरी आता प्रदूषित झालेल्या आहेत. शहरातील सांडपाणी आणि उद्योगधंद्यातील प्रक्रिया न केलेले रसायनमिश्रित पाणी यामुळे जलप्रदूषण वाढले आहे. हे जलप्रदूषण कमी करून जमिनीतील जलपुनर्भरण वाढवणे आवश्यक आहे, ते होत नाही.

महाराष्ट्रात शेती आणि उद्योगासाठी पाण्याचा बेसुमार उपसा होतो. पण धरणे, विहिरी, कालवे यातील पाण्याचे पुनर्भरण होत नाही. हे वाढवणे आवश्यक आहे. लोकसंख्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता आणि लोकांची मानसिकता लक्षात घेता येत्या काळात लोकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पाण्याबाबत लोकांचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. मिळणाऱ्या पाण्याचा उपसा कमी करून जल प्रदूषणाबाबत कठोर कायदा आणि त्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

आज ग्रामीण भागात देखील एक लीटरची पाण्याची बाटली २० ते २५ रुपयांना विकली जात आहे. हे बाटलीबंद पाणी विकत घेण्याची लोकांची मानसिकता बनली आहे. पण जल व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जलव्यवस्थापन हा महाराष्ट्रच नव्हे तर आपल्या देशासमोरील खूप मोठा प्रश्न पुढील काही वर्षात असणार आहे. पुढील १० वर्षात भीषण पाणीटंचाई होणारा देश म्हणून भारताकडे बोट दाखवले जाईल, यात शंकाच नाही.

आपल्याकडे राज्याअंतर्गत आणि राज्यांराज्यांमध्ये पाणीप्रश्न पेटला असून हा प्रश्न जटील बनू लागला आहे.

येत्या १० वर्षात पाणी प्रश्न अधिक समस्यांना जन्म देणारा ठरणार आहे. खा-या पाण्याला पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे प्रयोग सुरू आहेत. परंतु ते फार खर्चिक असल्यामुळे ते भारतासारख्या देशाला परवडणारे नाहीत. म्हणून जल व्यवस्थापन करताना सर्वच पातळीवर लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. जल साक्षरता आणि त्यातून येणारे जल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. त्यासाठी लोकांनी आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे शिवरायांच्या काळात जलव्यवस्थापन कचरा व्यवस्थापन, गडकोट नियोजन राबवले गेले, त्याचप्रमाणे सद्यस्थितीत देशातील वेगवेगळ्या घटकात सरकार आणि लोकांच्या कडून पाणी नियोजनाबद्दल विविध उपक्रम राबविले गेले पाहिजेत.

©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर,
9657744283.

Wednesday 27 March 2019

म्हशींचे पाणी आणि धगधगती आग !!




पेठवडगाव मधून रात्रीचे दहा वाजता कोल्हापूर कडे येत होतो, वाटेत एका ठिकाणी एक झाड जळताना दिसले मजबुतीने उभे असलेले हे झाड खोडातून जळत होते. का कुणास ठाऊक बघवलं नाही आणि गाडी बाजूला घेतली. बॅगमधील पाण्याची बाटली काढली आणि उरलंसुरलं पाणी त्या जळत्या झाडाच्या खोडावर टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, चर्रर्र आवाज आला आणि निखार्‍यावर पाणी मारावे आणि निखारे शांत व्हावेत आणि असं काहीतरी झालं.

विचार केला, हे जर असं ठेवलं तर हे झाड संपूर्ण जळून पडेल. इकडे तिकडे पाहिलं, पण आजूबाजूला पाणी नव्हतं. पुढे थोड्या अंतरावर एक घर दिसले. गाडीला स्टार्टर मारला आणि तिथे गेलो. घराच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. 

समोर म्हशींना धुण्यासाठी आणि पिण्यासाठी केलेल्या हौदात थोडे पाणी दिसलं आणि हिरवळ झालेला पाण्यात पिण्याची पाण्याची बाटली  बुडवली बाटली भरून पाणी घेतलं.

पाणी घेऊन तसाच पुन्हा झाडाजवळ मागे आलो, झाडाच्या आग लागलेल्या भागावर पाणी मारण्याचा प्रयत्न केला, झाडाची उंची थोडी जास्त असल्यामुळे पाणी नीट मारता नाही आलं, खुपसं वाया गेलं, शिवाय झाडाच्या आजूबाजूला आग लागली होती नि जळत होते, त्याच्यामुळे झाडाजवळ जाता येईना. बरच पाणी वाया गेलं पण झाडाचे पेटलेलं खोड काही विझल नाही. 

जवळ एखाद पसरट भांडे असतं तर पद्धतशीरपणे त्या जळणाऱ्या खोडावर पाणी मारता आले असते, पण जमलं नाही शेवटी एक डोक्यात विचार आला तसंच हिरवे शेवाळलेले पाणी तोंडात भरुन घेतले आणि तोंडाची पिचकारी लांबूनच त्या झाडावर मारली. 

बरोबर नेम लागला आणि जे होतं ते सर्व पाणी असं करत करत दहा-बारा पिचकाऱ्या नंतर बऱ्यापैकी झाडात आणि झाडात खोडातील लागलेली आग बर्‍यापैकी कंट्रोल झाली. पण अजून थोडस धुपत होतं जिथपर्यंत मला पाणी मारता येत नव्हतं, पुन्हा परत त्या घराजवळ गेलो पून्हा ते शेवाळलेले पाणी घेऊन झाडाजवळ आलो मनात त्या *म्हशीला नमस्कार केला* आणि पुन्हा तोंडात घेऊन ते पाणी चूळ भरल्या सारखे त्या झाडाच्या खोडावर पिचकारी च्या स्वरूपात मारलं.

असो, ही काही खूप मोठी गोष्ट नव्हती पण मुद्दा हा होता की या झाडांना  ही आग लावली कोणी ? असं कोणीही उठतय आणि आग वणवे लावत सुटतेय ? आजकाल जंगल आणि आजूबाजूला काड्या लावून काही लोकं आग लावत आहेत.

हे कुठेतरी थांबले पाहिजे लोकांनाही कळत नाहीये की, वन्यजीव संपत्ती आपल्यासाठीच आहे, रस्ते विकास प्रकल्पासाठी ही झाडे तोडण्याची पद्धतशीर अवलंबलेली पद्धती आहे हे मला माहिती आहे. पण अशी झाडं तोडून कधीही शाश्वत विकास होणार नाहीये, याकरिता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

माझी पेटवडगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना नम्रतेची विनंती आहे की, तुमच्या आजूबाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी झाड आहेत ही तुमच्या भागातील खरी संपत्ती आहे याची जपणूक जितकी चांगली होईल तितकं तुमचं जीवन सुकर होईल यात वादच नाही.

तसही पेठ वडगाव च्या आजूबाजूच्या लोकांनी जैवविविधता खूप चांगल्या पद्धतीने जतन केलेली आहे.  पेठवडगाव मध्ये माझे काही निसर्गप्रेमी मित्र आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने वन्यजीव संपदा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

आपण अशी लागलेले वनवे किंवा आग यांची काळजी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करावा व आपल्या परिसरातील झाडे आणि वृक्ष जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे मला वाटते.

©उमाकांत चव्हाण,
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.
९६५७७४४२८३.

वणवा ! जबाबदारी कोणाची ? आपली का वनखात्याची ?

वणवा !!

दरवर्षी आपल्या जंगलांना वणवे लागतात, उन्हाळा सुरू झाला ही सर्व डोंगर की पिवळे पडलेले दिसतात, डोंगरावरचं गवत वाढलेलं असतं आणि कोणीतरी आगाऊ माणूस या गवतात सिगरेट्सचे थोटुक किंवा काडी टाकतो आणि मग हा सर्व डोंगर हा हा म्हणता क्षणभरात आगीचे रौद्र स्वरूप धारण करतो.

या डोंगरावर असणारी दुर्मिळ वन्यजीव संपदा, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी, त्यांची अंडी ही सगळे क्षणभरात जळून खाक होते आणि मग उरतो तो फक्त धुर आणि गर्द काळी छाया..!!

कुठेतरी उडत असलेलं एक काळं कस्पट हळूच उडून तुमच्या अंगावर येतं आणि तुम्ही त्याला बाजूला टाकायला जाता तर त्याची काळी काजळी तुमच्या अंगावरील कपडे लागते आणि तुम्ही म्हणता, "अरे देवा ! हे काय झालं ?" पण त्या काळ्या कस्पटात हजारो वन्यजीवांचा आक्रोश तुम्हाला दिसत नाही हे दुर्दैव आहे.

तुम्ही टाकलेली एक काडी कित्त्येकांच आयुष्य जाळू शकते हे आपल्याला लक्षात येत नाही.

हे वनवे विझवायला वन खात्याकड पुरेसं मनुष्यबळ नाहीये, ना त्यांच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे. याचा अर्थ असा नाहीये की, हे लोक प्रयत्नच करत नाहीत. प्रयत्न तर त्यांचे चालूच असतात, पण आपल्या आजूबाजूच्या जंगलांच पेटणं आणि त्याचा वणवा इतका मोठा असतो की, एक अक्ख गाव जरी ते विझवायला गेलं तरी ते सहजासहजी विझणार नसत, कारण कोणाच्या तरी डोक्यात पेटलेली आग, ही क्षणभरात मना सकट माणूस जाळून काढते, आणि मग त्यामध्ये भस्मसात होतात असंख्य वन्यजीव..!!

काही अभ्यासकांच्या मते २००३ पासून २०१७ पर्यंत या काळात जंगलातील आगींचे प्रमाण हे ४५ टक्के वाढले आहे देशाचा विचार केल्यास उत्तराखंड येथे एकूण २२ ठिकाणी जंगलात वणवा पेटलेला आहे. गेल्या ८-१० आठवड्यात साधारणपणे १५०० ठिकाणी जंगलात आगीचे प्रकार झाले असल्याच्या बातम्या सुन्न करणाऱ्या आहेत. तामीळनाडू येथे लागलेल्या आगीत जीवितहानी झाल्याचे दुर्दैवी प्रकार घडले आहे. अभ्यासकांच्या मते नैसर्गिक वणव्यांना कारणीभूत ठरत असलेले मुख्य कारण आहे की, १९७१ पासून सातत्याने उष्ण लहरींचे वाढलेले प्रमाण आणि शीत लहरींचे कमी होत असलेले प्रमाण हा निसर्गातील असमतोल जंगलातील वणव्यांना निमित्त ठरतो आहे.

त्यामुळे देशपातळीवर जंगलात निर्माण झालेले शुष्क वातावरण हे या आगींच्या तीव्रतेला हातभार लावण्यास अधिक कारणीभूत ठरते आहे असे २०१३ सालच्या निसर्गतज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकोपातून अनेक पक्षी, त्यांची घरटी, सरपटणारे प्राणी यांची मोठय़ा प्रमाणात होणारी जीवितहानी हा मोठा चिंतेचा विषय आहे, शिवाय ज्या परिसरात आग लागते तिथली जमीन जैवविविधतेच्या दृष्टीने पुनर्स्थापित होण्यास बराच कालावधी जाऊ द्यावा लागल्याने एक प्रकारे जंगलांच्या विरळतेत अधिक भर घालणारा ठरतो.

या वनव्यांना परदेशात कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा आहेत. काही ठिकाणी तर जंगलांवर विमानातून पाणी सोडले जाते, आपल्याकडे अजून अशा यंत्रणा नाही. त्यामुळे अजूनही पारंपारिक पद्धतीने म्हणजेच झाडपाला घेऊन आग विझवण्याची पद्धत आहे, तीच अमलात आणली जाते.

काही ठिकाणी सध्या ब्लोवर नावाचं यंत्र आलेला आहे, पण हे कितपत आग विझवणार हा मोठा प्रश्न आहे..!! कारण जंगलाला लागलेली आग ही सामान्यता सात ते आठ फुटाची आगीची लाट निर्माण करते आणि उसळते त्यामुळे अशा आगीच्या आसपास जाऊन ती विजवणे म्हणजे भयंकर अवघड गोष्ट आहे.

कृपया आपल्या आजूबाजूला च्या जंगलाला जर आग लागली किंवा धूर निघत असेल, तर ताबडतोब वन खात्याला त्याची माहिती द्या आणि ती आग विझवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

पर्यावरण संरक्षण म्हणजे नुसतं बोलणं किंवा नुसतं लिहिणं किंवा फक्त रंगपंचमीला पाणी वाचवणे न्हवे तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल घडवून पर्यावरणीयदृष्ट्या त्या गोष्टींचं महत्त्व ओळखून निसर्गाच्या सोबत चांगलं जगणं, म्हणजेच पर्यावरण संरक्षण होय...!!

अवेअरनेस प्रोग्रॅम घेणे जास्त गरजेचे आहे, तसेच सध्या असलेल्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करणेदेखील तेवढेच गरजेचे आहे, असं मला वाटतं..!!

त्यामुळे आग जर लागत असेल तर ती विझण्याचं तंत्रज्ञान जसे डिझास्टर मॅनेजमेंट करत असते तशीच काहीशी सोय प्रत्येक गावात झाली पाहिजे, म्हणजे प्रत्येक गावात नैसर्गिक आपत्तीपासून गावाला कसे वाचवायचे आणि एखादा वन्यजीव जंगल सोडून गावाच्या हद्दीत आला तर त्याला सुरक्षित पकडून जंगलात कसे सोडायचे यांची एक समिती त्या ग्रामपंचायतीने त्या गावात नेमली पाहिजे, या समितीवर (संस्थेवर) वन्यजीव व पर्यावरण अभ्यासक हे सल्लागार म्हणून असावेत आणि प्रत्यक्ष गावातील तरुण मंडळातील काही कार्यकर्ते या समितीत सदस्य असावेत, यांच्याकडून हे निसर्गरक्षणाची काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल..!

©उमाकांत चव्हाण.
9657744283 #umakantchavan

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...