Thursday 28 March 2019

शिवरायांचे जलव्यवस्थापन !! © उमाकांत चव्हाण.

शिवरायांचे जलव्यवस्थापन..!!

©उमाकांत चव्हाण.

आपला देश नैसर्गिक साधन संपत्तीने विपुल असा देश आहे. वने, पर्जन्य जैयविविधता यामुळे समृद्ध असलेल्या देशातील आपली शेती बऱ्यापैकी मोसमी वाऱ्यावर अवलंबून आहे. त्यात भारतात सरासरी पावसाचे प्रमाणही चांगले आहे, पण परंतु या पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे हे पाणी जमिनीवर पडून वाहून जाते. ते अडवले जात नसल्यामुळे ते थेट नदी, नाले किंवा समुद्राला जाऊन मिळते. त्याचा काहीच फायदा आपल्या लोकांना होत नाही.

आज सारा महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण फिरतोय, पण शिवछत्रपतींच्या गडकोटांवर अजून देखील पाणी उपलब्ध आहे. "गडावर उदक पाहून उन गडू बांधून घ्यावा" हे आज्ञापत्रातील वाक्य आजही आपल्याला तंतोतंत लागू पडते.

एका पुस्तकात लिहले आहे की, रायगड किल्ल्यावरील सर्व पिण्याची टाकी आणि तलाव व्यवस्थित साफ करून पाण्याचे योग्य असे व्यवस्थापन केले तर आजूबाजूच्या शंभर गावांना बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा करता येईल असे जवळपास ३८५ किल्ले महाराष्ट्रात आहेत ३८५ पैकी जवळजवळ ७०% किल्ल्यावर बाराही महिने पाणी साठा असतो अगदी भर उन्हाळ्यात देखील पाणी असते पण आपल्या देखभाली मुळे तलाव आणि टाक्यांमध्ये गाळ आणि कचरा साचून दुर्गंधी पसरलेली आहे ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी जे जाणवले ते आज आपण अंमलात देखील आणू शकत नाही.

शिवरायांनी  आपल्या कालखंडात देखील शेतीच्या पाण्याचे अगदी  पुरेपूर नियोजन केले होते, पण आज आपल्याकडे शेतीला पावसाळय़ात मिळणारे पाणी ही जमेची बाब सोडली तर पावसाचा फारसा उपयोग होत नाही किंबहुना तो करता येत नाही, कारण शेतीसाठी पाऊस हे समीकरण मान्य केले तरी इतर सगळ्या गोष्टींसाठी पाणी लागते, हे समीकरण लोक मान्य करायला तयार नाहीत. त्यांची तशी मानसिकता बनत नाही, ही भयंकर गोष्ट आहे.

गिरिदुर्ग भटकणारे किंवा ट्रेकर्स यांना कदाचित आठवत असेल की, महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व किल्ल्यांवर पाण्याचे साठे आढळतात. यामध्ये अगदी उन्हाळ्यात देखील पिण्याचे पाणी असते. त्याचे नियोजन, त्याची बांधणी, पाणीसाठा इतका अप्रतिम ठेवला गेला आहे की अजून पुढे कित्येक वर्ष या बावडीत किंवा विहिरीत पाणी शिल्लक राहील आणि ते पाणी आजही चवीला तितकच सुमधुर आणि थंड आहे.

शिवकालीन समाजव्यवस्थेत  कूळ कायद्याने जमीन कसणे ही एक पद्धत होती शिवाय त्या जमिनीतील पाण्याचे नियोजन हे  गावातले लोक एकत्र मिळून करत  त्यांना सरकारी दरबारातून मदत होत असे, पण पाण्याचे नियोजन करण्यात गावकऱ्यांचा व रयतेचा  सहभाग होता. आपल्याकडे आत्ता गेल्या काही वर्षात लोकांचा सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता वाढलेली आहे. सरकार करेल, त्यांनी करावे, अशी मानसिकता आता कालबाहय झाली पाहिजे.

शेतीसाठी जसे पाणी लागते त्याच प्रकारे घरगुती आणि घराबाहेर उद्योगधंदे तसेच इतर वापरासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. पण शेतीशिवाय विहिरी, धरणे, कालवे यांच्यात पावसाचे पडणारे पाणी असते. त्या व्यतिरिक्त शहरे आणि ग्रामीण भागांसाठी वर्षभर पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे, ते होत नाही.

आपल्याकडे जल प्रदूषणाचे प्रमाण इतके वाढलेले आहे की, त्यामुळे देशभरातील नद्या, कालवे आणि शहरांच्या मध्यभागी असलेल्या विहिरी आता प्रदूषित झालेल्या आहेत. शहरातील सांडपाणी आणि उद्योगधंद्यातील प्रक्रिया न केलेले रसायनमिश्रित पाणी यामुळे जलप्रदूषण वाढले आहे. हे जलप्रदूषण कमी करून जमिनीतील जलपुनर्भरण वाढवणे आवश्यक आहे, ते होत नाही.

महाराष्ट्रात शेती आणि उद्योगासाठी पाण्याचा बेसुमार उपसा होतो. पण धरणे, विहिरी, कालवे यातील पाण्याचे पुनर्भरण होत नाही. हे वाढवणे आवश्यक आहे. लोकसंख्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता आणि लोकांची मानसिकता लक्षात घेता येत्या काळात लोकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पाण्याबाबत लोकांचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. मिळणाऱ्या पाण्याचा उपसा कमी करून जल प्रदूषणाबाबत कठोर कायदा आणि त्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

आज ग्रामीण भागात देखील एक लीटरची पाण्याची बाटली २० ते २५ रुपयांना विकली जात आहे. हे बाटलीबंद पाणी विकत घेण्याची लोकांची मानसिकता बनली आहे. पण जल व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जलव्यवस्थापन हा महाराष्ट्रच नव्हे तर आपल्या देशासमोरील खूप मोठा प्रश्न पुढील काही वर्षात असणार आहे. पुढील १० वर्षात भीषण पाणीटंचाई होणारा देश म्हणून भारताकडे बोट दाखवले जाईल, यात शंकाच नाही.

आपल्याकडे राज्याअंतर्गत आणि राज्यांराज्यांमध्ये पाणीप्रश्न पेटला असून हा प्रश्न जटील बनू लागला आहे.

येत्या १० वर्षात पाणी प्रश्न अधिक समस्यांना जन्म देणारा ठरणार आहे. खा-या पाण्याला पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे प्रयोग सुरू आहेत. परंतु ते फार खर्चिक असल्यामुळे ते भारतासारख्या देशाला परवडणारे नाहीत. म्हणून जल व्यवस्थापन करताना सर्वच पातळीवर लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. जल साक्षरता आणि त्यातून येणारे जल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. त्यासाठी लोकांनी आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे शिवरायांच्या काळात जलव्यवस्थापन कचरा व्यवस्थापन, गडकोट नियोजन राबवले गेले, त्याचप्रमाणे सद्यस्थितीत देशातील वेगवेगळ्या घटकात सरकार आणि लोकांच्या कडून पाणी नियोजनाबद्दल विविध उपक्रम राबविले गेले पाहिजेत.

©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर,
9657744283.

Wednesday 27 March 2019

म्हशींचे पाणी आणि धगधगती आग !!




पेठवडगाव मधून रात्रीचे दहा वाजता कोल्हापूर कडे येत होतो, वाटेत एका ठिकाणी एक झाड जळताना दिसले मजबुतीने उभे असलेले हे झाड खोडातून जळत होते. का कुणास ठाऊक बघवलं नाही आणि गाडी बाजूला घेतली. बॅगमधील पाण्याची बाटली काढली आणि उरलंसुरलं पाणी त्या जळत्या झाडाच्या खोडावर टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, चर्रर्र आवाज आला आणि निखार्‍यावर पाणी मारावे आणि निखारे शांत व्हावेत आणि असं काहीतरी झालं.

विचार केला, हे जर असं ठेवलं तर हे झाड संपूर्ण जळून पडेल. इकडे तिकडे पाहिलं, पण आजूबाजूला पाणी नव्हतं. पुढे थोड्या अंतरावर एक घर दिसले. गाडीला स्टार्टर मारला आणि तिथे गेलो. घराच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. 

समोर म्हशींना धुण्यासाठी आणि पिण्यासाठी केलेल्या हौदात थोडे पाणी दिसलं आणि हिरवळ झालेला पाण्यात पिण्याची पाण्याची बाटली  बुडवली बाटली भरून पाणी घेतलं.

पाणी घेऊन तसाच पुन्हा झाडाजवळ मागे आलो, झाडाच्या आग लागलेल्या भागावर पाणी मारण्याचा प्रयत्न केला, झाडाची उंची थोडी जास्त असल्यामुळे पाणी नीट मारता नाही आलं, खुपसं वाया गेलं, शिवाय झाडाच्या आजूबाजूला आग लागली होती नि जळत होते, त्याच्यामुळे झाडाजवळ जाता येईना. बरच पाणी वाया गेलं पण झाडाचे पेटलेलं खोड काही विझल नाही. 

जवळ एखाद पसरट भांडे असतं तर पद्धतशीरपणे त्या जळणाऱ्या खोडावर पाणी मारता आले असते, पण जमलं नाही शेवटी एक डोक्यात विचार आला तसंच हिरवे शेवाळलेले पाणी तोंडात भरुन घेतले आणि तोंडाची पिचकारी लांबूनच त्या झाडावर मारली. 

बरोबर नेम लागला आणि जे होतं ते सर्व पाणी असं करत करत दहा-बारा पिचकाऱ्या नंतर बऱ्यापैकी झाडात आणि झाडात खोडातील लागलेली आग बर्‍यापैकी कंट्रोल झाली. पण अजून थोडस धुपत होतं जिथपर्यंत मला पाणी मारता येत नव्हतं, पुन्हा परत त्या घराजवळ गेलो पून्हा ते शेवाळलेले पाणी घेऊन झाडाजवळ आलो मनात त्या *म्हशीला नमस्कार केला* आणि पुन्हा तोंडात घेऊन ते पाणी चूळ भरल्या सारखे त्या झाडाच्या खोडावर पिचकारी च्या स्वरूपात मारलं.

असो, ही काही खूप मोठी गोष्ट नव्हती पण मुद्दा हा होता की या झाडांना  ही आग लावली कोणी ? असं कोणीही उठतय आणि आग वणवे लावत सुटतेय ? आजकाल जंगल आणि आजूबाजूला काड्या लावून काही लोकं आग लावत आहेत.

हे कुठेतरी थांबले पाहिजे लोकांनाही कळत नाहीये की, वन्यजीव संपत्ती आपल्यासाठीच आहे, रस्ते विकास प्रकल्पासाठी ही झाडे तोडण्याची पद्धतशीर अवलंबलेली पद्धती आहे हे मला माहिती आहे. पण अशी झाडं तोडून कधीही शाश्वत विकास होणार नाहीये, याकरिता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

माझी पेटवडगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना नम्रतेची विनंती आहे की, तुमच्या आजूबाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी झाड आहेत ही तुमच्या भागातील खरी संपत्ती आहे याची जपणूक जितकी चांगली होईल तितकं तुमचं जीवन सुकर होईल यात वादच नाही.

तसही पेठ वडगाव च्या आजूबाजूच्या लोकांनी जैवविविधता खूप चांगल्या पद्धतीने जतन केलेली आहे.  पेठवडगाव मध्ये माझे काही निसर्गप्रेमी मित्र आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने वन्यजीव संपदा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

आपण अशी लागलेले वनवे किंवा आग यांची काळजी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करावा व आपल्या परिसरातील झाडे आणि वृक्ष जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे मला वाटते.

©उमाकांत चव्हाण,
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.
९६५७७४४२८३.

वणवा ! जबाबदारी कोणाची ? आपली का वनखात्याची ?

वणवा !!

दरवर्षी आपल्या जंगलांना वणवे लागतात, उन्हाळा सुरू झाला ही सर्व डोंगर की पिवळे पडलेले दिसतात, डोंगरावरचं गवत वाढलेलं असतं आणि कोणीतरी आगाऊ माणूस या गवतात सिगरेट्सचे थोटुक किंवा काडी टाकतो आणि मग हा सर्व डोंगर हा हा म्हणता क्षणभरात आगीचे रौद्र स्वरूप धारण करतो.

या डोंगरावर असणारी दुर्मिळ वन्यजीव संपदा, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी, त्यांची अंडी ही सगळे क्षणभरात जळून खाक होते आणि मग उरतो तो फक्त धुर आणि गर्द काळी छाया..!!

कुठेतरी उडत असलेलं एक काळं कस्पट हळूच उडून तुमच्या अंगावर येतं आणि तुम्ही त्याला बाजूला टाकायला जाता तर त्याची काळी काजळी तुमच्या अंगावरील कपडे लागते आणि तुम्ही म्हणता, "अरे देवा ! हे काय झालं ?" पण त्या काळ्या कस्पटात हजारो वन्यजीवांचा आक्रोश तुम्हाला दिसत नाही हे दुर्दैव आहे.

तुम्ही टाकलेली एक काडी कित्त्येकांच आयुष्य जाळू शकते हे आपल्याला लक्षात येत नाही.

हे वनवे विझवायला वन खात्याकड पुरेसं मनुष्यबळ नाहीये, ना त्यांच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे. याचा अर्थ असा नाहीये की, हे लोक प्रयत्नच करत नाहीत. प्रयत्न तर त्यांचे चालूच असतात, पण आपल्या आजूबाजूच्या जंगलांच पेटणं आणि त्याचा वणवा इतका मोठा असतो की, एक अक्ख गाव जरी ते विझवायला गेलं तरी ते सहजासहजी विझणार नसत, कारण कोणाच्या तरी डोक्यात पेटलेली आग, ही क्षणभरात मना सकट माणूस जाळून काढते, आणि मग त्यामध्ये भस्मसात होतात असंख्य वन्यजीव..!!

काही अभ्यासकांच्या मते २००३ पासून २०१७ पर्यंत या काळात जंगलातील आगींचे प्रमाण हे ४५ टक्के वाढले आहे देशाचा विचार केल्यास उत्तराखंड येथे एकूण २२ ठिकाणी जंगलात वणवा पेटलेला आहे. गेल्या ८-१० आठवड्यात साधारणपणे १५०० ठिकाणी जंगलात आगीचे प्रकार झाले असल्याच्या बातम्या सुन्न करणाऱ्या आहेत. तामीळनाडू येथे लागलेल्या आगीत जीवितहानी झाल्याचे दुर्दैवी प्रकार घडले आहे. अभ्यासकांच्या मते नैसर्गिक वणव्यांना कारणीभूत ठरत असलेले मुख्य कारण आहे की, १९७१ पासून सातत्याने उष्ण लहरींचे वाढलेले प्रमाण आणि शीत लहरींचे कमी होत असलेले प्रमाण हा निसर्गातील असमतोल जंगलातील वणव्यांना निमित्त ठरतो आहे.

त्यामुळे देशपातळीवर जंगलात निर्माण झालेले शुष्क वातावरण हे या आगींच्या तीव्रतेला हातभार लावण्यास अधिक कारणीभूत ठरते आहे असे २०१३ सालच्या निसर्गतज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकोपातून अनेक पक्षी, त्यांची घरटी, सरपटणारे प्राणी यांची मोठय़ा प्रमाणात होणारी जीवितहानी हा मोठा चिंतेचा विषय आहे, शिवाय ज्या परिसरात आग लागते तिथली जमीन जैवविविधतेच्या दृष्टीने पुनर्स्थापित होण्यास बराच कालावधी जाऊ द्यावा लागल्याने एक प्रकारे जंगलांच्या विरळतेत अधिक भर घालणारा ठरतो.

या वनव्यांना परदेशात कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा आहेत. काही ठिकाणी तर जंगलांवर विमानातून पाणी सोडले जाते, आपल्याकडे अजून अशा यंत्रणा नाही. त्यामुळे अजूनही पारंपारिक पद्धतीने म्हणजेच झाडपाला घेऊन आग विझवण्याची पद्धत आहे, तीच अमलात आणली जाते.

काही ठिकाणी सध्या ब्लोवर नावाचं यंत्र आलेला आहे, पण हे कितपत आग विझवणार हा मोठा प्रश्न आहे..!! कारण जंगलाला लागलेली आग ही सामान्यता सात ते आठ फुटाची आगीची लाट निर्माण करते आणि उसळते त्यामुळे अशा आगीच्या आसपास जाऊन ती विजवणे म्हणजे भयंकर अवघड गोष्ट आहे.

कृपया आपल्या आजूबाजूला च्या जंगलाला जर आग लागली किंवा धूर निघत असेल, तर ताबडतोब वन खात्याला त्याची माहिती द्या आणि ती आग विझवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

पर्यावरण संरक्षण म्हणजे नुसतं बोलणं किंवा नुसतं लिहिणं किंवा फक्त रंगपंचमीला पाणी वाचवणे न्हवे तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल घडवून पर्यावरणीयदृष्ट्या त्या गोष्टींचं महत्त्व ओळखून निसर्गाच्या सोबत चांगलं जगणं, म्हणजेच पर्यावरण संरक्षण होय...!!

अवेअरनेस प्रोग्रॅम घेणे जास्त गरजेचे आहे, तसेच सध्या असलेल्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करणेदेखील तेवढेच गरजेचे आहे, असं मला वाटतं..!!

त्यामुळे आग जर लागत असेल तर ती विझण्याचं तंत्रज्ञान जसे डिझास्टर मॅनेजमेंट करत असते तशीच काहीशी सोय प्रत्येक गावात झाली पाहिजे, म्हणजे प्रत्येक गावात नैसर्गिक आपत्तीपासून गावाला कसे वाचवायचे आणि एखादा वन्यजीव जंगल सोडून गावाच्या हद्दीत आला तर त्याला सुरक्षित पकडून जंगलात कसे सोडायचे यांची एक समिती त्या ग्रामपंचायतीने त्या गावात नेमली पाहिजे, या समितीवर (संस्थेवर) वन्यजीव व पर्यावरण अभ्यासक हे सल्लागार म्हणून असावेत आणि प्रत्यक्ष गावातील तरुण मंडळातील काही कार्यकर्ते या समितीत सदस्य असावेत, यांच्याकडून हे निसर्गरक्षणाची काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल..!

©उमाकांत चव्हाण.
9657744283 #umakantchavan

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...