Sunday 29 September 2019

ढग फुटतो तेंव्हा ! - cloudburst explained by Umakant chavan

©उमाकांत चव्हाण.

ढगफुटी ही एक अशी नैसर्गिक आपत्ती किव्हा घटना आहे की ज्यामध्ये आंतर रेणूची फोर्स आणि H2O म्हणजे पाणी यांच्या रेणू मध्ये खूप फास्ट व तीव्र प्रमाणात प्रक्रिया घडते व अंतर रेणुची शक्ती झपाट्याने घट झाल्यामुळे किंवा ढगांमधील इलेक्ट्रोस्टॅटीक प्रेरणा पेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे पाण्याचे रेणू जास्त वजनदार बनतात आणि त्यामुळे ढग वाढीव झालेले पाणी धारण करू शकत नाही. पाण्याचे रेणू जनतेने जास्त वाढतात व घनरूप होतात आणि इलेक्ट्रो फोर्सच्या अधिक त्यामुळे ढग त्यांना धरून ठेवू शकत नाहीत पाण्याचे प्रमाण जास्त व अधिक होत गेले आणि वजन जर वाढले तर ते एकाच क्षणात एकाच ठिकाणी टाकतात, यालाच क्लाऊडबर्स्ट किंवा ढगफुटी असे म्हणतात.

हे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात असते की एका चौरस एकरात ७२,३०० टन इतके मोठे प्रमाणात पाणी सोडू शकतो, ही एक पाण्याची भिंत आहे अचानक आकाशातून फुटते आणि आपल्यावर येऊन आढळते.

परंतु सुदैवाने ही घटना सारखी होत नाही, वास्तविक पाहता क्लाऊडबर्स्ट किंवा ढगफुटी या घटना वारंवार होत नाहीत, कधीकधी ओरोग्रफिक लिफ्ट मुळे किंवा गरम हवा अचानक वर जाऊन थंड हवेत मिसळते आणि अचानक पाण्याची घनता वाढते १७०० साली घडलेली घटना असो किंवा १८०० ते २००० कालखंडात घडलेल्या घटना असो ढगफुटी पहिल्यापासून जमिनीचे उष्णता वाढल्यामुळेच होत आहे. शिवाय अचानक वातावरणाचा जो बदला होतो त्यामुळे देखील ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होते. कधीकधी सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे जमीन जिथे जास्त तापते तिथली हवा थंड व विरळ होऊन वरती जाते आणि आजूबाजूला जमलेल्या ढगातील पाणी घेऊन ढग एकत्र येतात त्यामुळे ढगफुटीची प्रक्रिया होते ही जरी एक सायंटिफिक गोष्ट असली तरीही ढगफुटी सदृश्य होणार्‍या घटना सध्या वारंवार घडत आहेत, यांची घडण्याची प्रखरता व वारंवारता (इन्टेन्सिटी ऑफ इव्हेंट) इथून पुढे वाढतच जाणार आहे.

त्याचे कारण आहे क्लायमेट चेंज..!

मुख्यता वातावरणातील उष्णतेचा मानवावर जसा परिणाम होतो, तसाच परिणाम निसर्गावर ही होतो. दोनशे प्रजाती दररोज नष्ट होत आहेत, याचा विचार करता मानवही प्रजाती देखील पुढील बारा-पंधरा वर्षांत नष्ट होण्याच्या मार्गावर उभी आहे. याकडे अजूनही मानवाचे लक्ष नाही. लवकरच याची प्रचिती येत राहील हीच परिस्थिती आहे.

प्रत्येक जण फक्त प्रगतीसाठी विकासासाठी पळतोय, परंतु नैसर्गिक प्रक्रिया आणि निसर्ग याला समजून न घेता जर आपण चंगळवाद व विघातक विकास याकडे लक्ष दिले तर निश्चितच मानव जातीचा अंत पुढच्या पंधरा वर्षात नक्कीच होईल. शास्त्रज्ञांनी पृथ्वीचे तापमानवाढ थांबवण्याची प्रक्रिया आपल्याला २०१३ पर्यंतच करणे अनिवार्य आहे असे सांगितले होते, २०१३ ला आपण हे तापमान रोखण्यासाठी सक्षम होतो, परंतु ती तारीख सोडून गेली तरीही आपण अजूनही यावर विचार करत आहोत.

दोन्ही ध्रुवावरील बर्फ यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मायक्रोब्ज आणि विघातक जिवाणू आहेत ते एकविसाव्या शतकाच्या अखेरीस वितळणार होते ते जून २०१८ ला वितळायला सुरुवात झाली हा रिपोर्ट ज्या दिवशी बाहेर आला त्या दिवशी पासून शास्त्रज्ञ सांगताहेत की सगळं संपणार आहे. हातात फक्त पाच ते सहा वर्ष आहेत, तरीदेखील अजूनही माणूस जागरूक नाही.

आपल्याला अजुन देखील हे कळत नाही की आता आपलं स्वतःचं जीवनच धोक्यात आहे, एक वेळ होती की ज्यावेळी *पृथ्वी वाचवा* किंवा *पर्यावरण वाचवा* असं ओरडत फिरुन सांगायला लागायचं, पण ती वेळ आपण २०१३ ला संपवली, आता *मानव प्रजाती वाचवा* हे सांगण्याची गरज आहे आणि यासाठी फक्त हातात *पाच वर्ष उरली आहेत* कारण हा विध्वंस होणार आहे हा निश्चितच आहे, फक्त तो पाच वर्षांनी होईल तर सहा वर्षांनी होईल आणि किती पुढे ढकलता येईल हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

विचार करा आणि कृती देखील करा..!

©उमाकांत चव्हाण.

https://youtu.be/Qvjwccilpew

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...