Tuesday 18 May 2021

चक्रीवादळं मानवनिर्मित ? कोणाचे परिणाम आहेत ?

परित्राणाय साधूनां..! 4.8।।

©उमाकांत चव्हाण.

कालच एक भयंकर वादळ येऊन गेलं, सध्या ते गुजरातच्या प्रदेशात आहे. किती आणि काय विध्वंस होणार हे कोणालाही सांगता येणार नाही. परंतु विध्वंस होणार हे नक्की आणि हा विध्वंस होतच राहणार हे देखील नक्की... 

या मागची ज्यावेळेस तात्कालीन कारण आपण शोधायला सुरुवात करतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की हे चक्रीवादळ देखील मानवानेच पर्यावरणाची केलेली हानी आहे. (आता काही लोक म्हणतील चक्रीवादळ माणसाने तयार केलेले नाहीत) परंतु हे खरंच सत्य आहे का ? याचा विचार करणे देखील गरजेचे आहे.

मानवानं खरंतर केलं काय या पृथ्वीवर येऊन ? याचा विचार करणं खरच गरजेचे आहे. मानवाने पृथ्वीवर येऊन केला फक्त आणि फक्त विनाश..! 
त्याच्या पलीकडे त्याला कधीही काहीही जमलेलं नाहीये.

एक छोटंसं उदाहरण देतो, 

चक्रीवादळ म्हणजे नेमकं काय ?

समजा एखाद्या या ठिकाणचे वातावरण आणि तापमान जर उष्णतेमुळे तापले आणि तप्त वातावरणामुळे तिथली हवा विरळ झाली तर ती वरच्या बाजूला सरकते, तेव्हा आजूबाजूच्या प्रदेशातील थंड हवा ती रिकामी जागा भरून काढण्याकरिता जोराने वाहू लागते, (मित्रांनो चे सहावी सातवी च्या पुस्तकात शिकवले आहे बर का ! खूप मोठं रॉकेट सायन्स असं काही नाही ) परंतु यामध्ये थोडेसे फॅक्ट असे आहेत की, जे इथं मुद्दामहून सांगू इच्छितो, ज्या वेळेस ही चक्रीवादळं समुद्रात निर्माण होतात त्यावेळेस त्यांना "सायक्लोन" असे म्हटले, जात आणि ज्या वेळेस अशी वादळ जमिनीवर निर्माण होतात त्यावेळेस त्यांना "टोरनॅडो" असे म्हणतात. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रदेशात निर्माण होणाऱ्या वादळांना प्रदेशानुसार वेगळी नावे देखील आहेत. सांगण्याचा उद्देश हाच की ज्यावेळेस एखाद्या ठिकाणचे तापमान तापते आणि तिथली हवा विरळ होऊन वरती ढकलली जाते, त्यावेळेस आजूबाजूची थंड प्रदेशातील हवा ही जागा ही पोकळी भरून काढण्याकरिता वाहू लागते आणि अशाप्रकारे वादळांचा जन्म होतो.

जर जमिनीवरही वादळ निर्माण झाले तर त्यांचा वेग खूप जास्त नसतो त्यामुळे कदाचित हानी कमी जास्त प्रमाणात होऊ शकते. परंतु जर समुद्री प्रदेशात किंवा पाण्यावर ही वादळे निर्माण झाली तर त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा नसल्यामुळे त्यांचा उपयोग खूपच जास्त वाढतो आणि त्यामुळे होणारी हानी देखील खूप जास्त प्रमाणात होते.

चक्रीवादळे ज्यावेळेस पाण्यावरून किंवा अति उष्ण भागावरून वाहतात त्यावेळेस त्यांचे स्पीड इतके जास्त वाढते की त्यांच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टींना ती उधळून लावतात. याउलट जमिनीवरून किंवा थंड प्रदेशातून जर हे वादळ वाहत असेल तर त्याचा वेग मंदावतो व व पर्जन्य स्वरूपात ते वादळ निसर्गात विरले जाते. सहाजिकच आहे समुद्रात ज्यावेळेस एखाद्या विशिष्ट भागाच्या भोवती जड वारे वर्तुळाकार फिरायला सुरुवात करतात त्यावेळेस चक्रीवादळ निर्माण होते या वादळांचे त्यांच्या वाहण्याच्या वेगा वरून वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत परंतु यातील सर्वसाधारण ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळापेक्षा जर वादळ जास्त वेगाने वाहू लागले तर निश्चितच वित्त हानी व मनुष्य हानी होण्याचे चान्सेस वाढतात.

एक वादळ तयार व्हायला जवळजवळ आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो आणि त्याचमुळे आपण आपल्याकडील असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून वादळाचा पुरेपूर अंदाज आणि त्याची दिशा ओळखू शकतो.

हे झालं वादळा बद्दल थोडसं परंतु ही वादळ निर्माण का होतात ?आणि माणसाचा यात काय हात आहे ? ते देखील आपण इथं पाहणार आहोत.

मित्रांनो, ही वादळे निर्माण काशी होतात हे तर मी सांगितले, पण प्रत्येक रोग निर्माण होण्याच्या मागे काहीतरी तात्कालिक कारण असत, हे देखील तितकेच सत्य आहे.
 
मुळात एखाद्या भागाचे तापमान का वाढते ? याचा जर तुम्ही विचार केला तर तापमान वाढीला सर्वस्वी जबाबदार कोण हे देखील तुम्हाला लक्षात आलेच असेल. मग त्यासाठी असलेली कारणे म्हणजे भरमसाठ बेसुमार होणारी वृक्षतोड, पाण्याचा अतिवापर, जमिनीची होणारी धूप, मोठमोठाली वाहने आणि त्यांच्या मुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे वाढत जाणारी तापमानवाढ, अति शहरीकरण, विध्वंसक विकास प्रकल्प, नैसर्गिक जंगले आणि डोंगर माथे यांची होणारी कत्तल हे सर्व कोण करत आहे ? 

मानवच ना..!

मग या वादळांना कोण जन्माला घालत आहे हे आपल्याला सांगायला हवेच का ?

कधी नव्हे ती अचानक जन्माला येणारी चक्रीवादळे, हवामान बदल हे आपली नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करण्याचे परिणाम आहेत. जे आपण आणि आपली पुढची पिढी भोगणार आहोत. (यातून सुटका करून घेण्याचा कालावधी 7 ते 8 वर्षांपूर्वी आपण गमावला आहे) त्यासाठी आता सज्ज राहिलेच पाहिजे. 

पण सामान्य जनता यामध्ये पिसून जात आहे आणि आणि फक्त राजकीय स्वार्थ साधण्याकरिता काही लोक हे नैसर्गिक साधन संपत्ती आणि साठे उध्वस्त करत आहेत. 

निसर्ग जेव्हा कोपतो त्यावेळेस तो सांगून कुठलीही गोष्ट करत नाही, मग कोरोना, असुदे चक्रीवादळ असू दे, पूर असू दे, दुष्काळ असू दे, ढगफुटी असू दे किंवा कोणतेही नैसर्गिक आपत्ती..!

माणूस या आपत्ती समोर कधीही काही करू शकणार नाही, म्हणून लक्षात घ्यायला हवे आणि शाश्वत जीवनशैली जोपर्यंत मानव जगायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत विध्वंस तर होणारच..! 

या सूचना आहेत निसर्गानं आपल्याला दिलेल्या या ओळखता आल्या पाहिजेत कारण की गीतेत भगवंताने सांगितलेलं आहे.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।4.8।।

©उमाकांत चव्हाण.

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...