Tuesday 27 August 2019

सावधान - पन्हाळ्याचा रस्ता खचतो आहे ! Umakant Chavan.

©उमाकांत चव्हाण.

भूगर्भातील होणाऱ्या विचित्र हालचाली मुळे आज-काल जे घडतंय ते आपल्याला सहजासहजी दिसतं, परंतु मानवी कृत्यामुळे झालेली पर्यावरणाची आणि आपल्या निसर्गाची हानी कधीही न भरून येणारी आहे, आणि ते कोणालाच सहज दिसत देखील नाही यात वादच नाहीये.

गेल्याच काही आठवड्यांपूर्वी कोल्हापूरची शान असलेला पन्हाळा आणि त्याच्या आजूबाजूचा डोंगराचा परिसर भूस्खलनामुळे हळूहळू खचू लागलेला आहे, पहिल्या आठवड्यात तर पावसामुळे पन्हाळ्याचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर चक्क मोठाली भेग पडली, इतकं मोठं निसर्गात आपण नुकसान करत आहोत याची मानवाला जरादेखील कल्पना नाहीये.

आपण आपल्या सोयीकरता डोंगर-दऱ्या, नद्या, पहाडी भाग या ठिकाणी घर बांधणे, शेतजमीन करणे, विघातक प्रकल्प करणे, खाणी काढणे, अशा वेगवेगळ्या पर्यावरणाला घातक असणाऱ्या संकल्पना राबवत आहोत, परंतु त्यामुळे पर्यावरणाची- निसर्गाची किती जास्त पटीने हानी होत आहे याकडे आपलं जरादेखील लक्ष नाही.

किंबहुना निसर्ग आपल्यावर कोपतो आहे हे दिसत असून देखील आपण जाणून बुजून त्या गोष्टींकडे कानाडोळा करत आहे.

कधी ना कधी हे मानवाला, मानवी पिढीला सोसायला लागणारच, परंतु किमान आपली भावी पिढी तरी सुरक्षित आणि आनंदी राहावी याकरिता पर्यावरण संरक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य समजून आजपासूनच आपण या सर्व गोष्टींच्या सोबत पर्यावरणाला देखील तितकंच महत्त्व देणे गरजेचे आहे जितकं आपली मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांना देतो.

कृपया पर्यावरणाच्या या लढ्यात साथ देऊन निसर्ग वाचवण्याकरिता मदत करा आणि ही गोष्ट तुम्ही तुमच्या घरापासूनच सुरुवात करू शकता.

© उमाकांत चव्हाण.

Kaas - कास मध्ये बिबट्या आलाय ! मग आता त्याला मारायचे काय ? Umakant Chavan


https://youtu.be/OBtqDLxW3vQ

मानव आपल्या स्वार्थासाठी वन्यजीवांची अतोनात हानी करत आहे, पण आता त्याच्या घरात घुसून जर त्यांना बाहेर काढायचे ठरवले तर ते कितपत योग्य आहे आपणच ठरवूया ! जाणून घ्या त्यांच्या व्यथा...!

आपली मते आणि प्रतिक्रिया इथं जरूर मांडा..!

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...