Saturday 10 April 2021


घुमटीच्या बहिरीची निमित्ताने एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे निसर्ग खूप मोठा आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतका मोठा..! 

आपल्या कल्पनेच्या सीमारेषा जिथे संपतात, तिथं निसर्गाची जीवनरेषा सुरू होते आणि त्यानंतर जे दिसतं, जे भासतं, जे असतं.. ते आहे निसर्गाचे विराट स्वरुप...!

आपण कितीही मोठे झालो तरी निसर्गाच्या पायाजवळ देखील पोहोचू शकत नाही, हे जाणवलं..

हा दिवस माझ्यासाठी इतका सुंदर होता की या दिवसात मला माझ्यातला, "मी" सापडलो.. ! आयुष्यातून जगण्याचं मूळ सापडणे म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील खूप मोठा आनंद दडलेला असतो, हे त्या धनगरवाड्या वर असलेल्या मुलांच्या मळकट झालेल्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्यावर जानवलं.. 

देशात करण्यासारखी भरपूर कामे आहेत ही सगळी कामे सोडून लोक नको ती, नको त्या पद्धतीने टाइमपास का करतात ? असे देखील वाटलं.

या समाजाला शिक्षणाची गरज आहे, पण या समाजाला शिक्षण आणि संस्कृती या दोनच गोष्टी चांगल्या पद्धतीने शिकवायची गरज वाटली, कारण की निसर्ग आणि जंगल हे त्यांनी अतिशय सुंदर जपलेलं आहे. त्यांना जर आयता कष्ट न करता इथून पैसा कसा मिळतो हे समजले तर निश्चितच ही लोक देखील हे जंगल जास्तच खराब करायला मागेपुढे पाहणार नाहीत. 

आज समाजात, जंगलाच्या जीवावर, वन्यजीवांच्या जीवावर आणि फोटोग्राफी म्हणून जंगलांची जी नासधुस चालू आहे ती उघड्या डोळ्यांनी पाहतोय, किंबहुना त्याच क्षेत्रात असल्यामुळे मलाही ते भासतय.

या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत नुसतं जाऊन चांगले फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करणे, म्हणजेच जर वाइल्डलाइफ फोटोग्राफी असेल तर आजकाल प्रत्येक घरात एकतरी फरान कुरेशी जन्माला आलेला आहे.

प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये कॅमेरा आहे आणि त्या कॅमेराचा नको इतका वापर आपण सर्रासपणे करतो. काही चांगल्या ठिकाणी होतो, तर काही ठिकाणी वाईट..!

हे नक्कीच मी सांगू शकतो. आपण काढलेल्या जंगलातील वन्यजीवांच्या प्राण्यांचे आणि त्या फोटोंचे पुढेमागे सत्कर्मी लागण्यासारखे काहीतरी होत असेल तर त्या फोटोला अर्थ आहे..! नाहीतर तुम्ही केलेली मेहनत आणि जंगलांची नासधूस हे सर्व व्यर्थ आहे..! 

जंगलात फक्त फोटोग्राफी करण्याकरिता जाण्यात काही अर्थ नाही या संपूर्ण दिवसात मी फक्त आठ ते नऊ फोटो या जंगलात काढले असतील. एरवी जंगलात गेल्यानंतर मला पन्नास फुटाचा रेडीएस मध्ये किमान शंभर दीडशे फोटो मिळतात. माझी नजर तितकी चौकस झालेली आहे.. पण का कुणास ठाऊक काल एक आगळ्यावेगळ्या ओढीन घुमटीच्या बहिरी ला गेलो होतो..! त्यामुळे या भागात फोटो काढणे ही कन्सेप्टच माझ्या आजूबाजूला फिरली नाही.

मी स्वच्छंद दिलखुलास मोकळ्या आकाशात गरुडासारखा भरारी घेत होतो आणि माझ्यासमोर होते निर्गुण, निर्भय आणि निराकार असं विश्व..!

जे सध्या या सिमेंटच्या जगात पाहायला मिळत नाही. हा आत्मिक आनंद मिळवण्याकरिता किती कष्ट करावे लागतात याची जाणीव देखील इथेच झाली.

गावातल्या वाड्या-वस्त्यांवर राहणारी हि लोक निसर्गाच्या इतक्या जवळ आहेत तरीदेखील त्यांना त्यांनी निसर्गाची १००% व्हॅल्यू माहिती नाही, किंबहुना ती माहित नाही म्हणूनच ते जंगल सुस्थितीत आहे, असे देखील वाटलं. 

माझ्या देवराईच्या पुस्तकात मी याची नोंद केली आहे की, धनगरवाडे, हरिजनांचे थळ आणि खेड्यापाड्यात डोंगर वस्तीत राहणाऱ्या या लोकांनीच पर्यावरण सर्वात जास्त जपलं..

त्यांच्यातील रूढी परंपरा आणि जंगलाबद्दल असलेली आदर युक्त भीती यामुळे त्या जंगलातली वन्यजीव संपदा आणि दुर्मिळ वृक्ष जपले गेले. 

पण आजकाल कायदे कानून सोडून देवालाही न घाबरणाऱ्या  मानवाने सृष्टीचा विनाश चालू केलेला आहे. जो कधी ना कधी त्याच मानवाच्या मुळावर येऊन घाव घालणारे यात शंकाच नाही...!

More details about wildlife and my articles... Stay connected with my page and blog...


2 comments:

  1. Jabaardaaastttt...! I always in love with your every trick, act to protect wildlife and environment and very important; your photography, writing skills...! Keep it up bro..!
    Regards, Rahul D. Mahajan.

    ReplyDelete

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...