Saturday 23 April 2016

सारा महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण फिरतोय पण....
छत्रपतींच्या गडकोटांवर अजुन देखील पाणी उपलब्ध आहे.

एका पुस्तकात लिहिलंय रायगड किल्ल्यावरील सर्व पाण्याची टाकी आणि तलाव व्यवस्थित साफ करून पाण्याचे योग्य असे व्यवस्थापन केले तर आजूबाजूच्या १०० गावांना बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा करता येईल.
असे जवळपास ३८५ किल्ले महाराष्ट्रात आहेत. ३८५ पैकी ७०% किल्ल्यांवर बाराही महिने पाणी असते अगदी भर उन्हाळ्यातदेखील. पण अपुऱ्या देखभालीमुळे तलाव अन् टाक्यांमध्ये गाळ आणि कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे.

३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी जे जाणले ते आज आपण साधे अमलात आणू शकत नाही.

*सह्याद्री संवर्धन केंद्र*
*कोल्हापुर*

No comments:

Post a Comment

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...